Surya Nakshatra Gochar 2025: नवग्रहात सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.

पंचागानुसार, सूर्य सध्या कर्क राशीत असून ऑगस्टमध्ये तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तसेच ऑगस्टमध्ये तब्बल तीन वेळा नक्षत्र परिवर्तनही करणार आहे. सूर्य ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार असून १७ ऑगस्ट रोजी तो मघा नक्षत्रात आणि ३० ऑगस्ट रोजी तो पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. ज्याच्या शुभ प्रभावाने तीन राशींचे भाग्य चमकेल.

‘या’ राशींचे भाग्य उजळणार

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच, यावेळी, तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंह (Singh Rashi)

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)