Marriage Kundali Gun Milan : विवाह हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र बंधनांपैकी एक मानला जातो. पण, पती-पत्नीचे वैवाहिक आयुष्य सुखा-समाधानाचे जावे यासाठी लग्नाआधी दोघांची कुंडली जुळते का हे पाहिले जाते. मुला-मुलीने एकमेकांना पसंत केल्यानंतर दोघांच्या घरचे आधी जन्मपत्रिका आणि कुंडली पाहतात. कारण हिंदू धर्मात असे मानले जाते की, लग्नानंतर दोन व्यक्ती एकमेकांशी जोडल्या जातात, ज्यामुळे भविष्यातील समस्या टाळता येतात. या कारणास्तव कुंडली जुळवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

कुंडली जुळवताना दोघांचे विचार आणि स्वभावाबरोबर इतर ३६ गुण जुळतात का याचा अंदाज येतो. याच विषयावर ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सविस्तर माहिती दिली आहे. (Wedding Astrology)

विवाह यशस्वी करण्यासाठी कुंडलीतील ३६ गुणांची तुलना केली जाते. हे ३६ गुण विविध जीवन तत्त्वांशी संबंधित असतात, जर दोघांच्याही कुंडलीतील ३६ पैकी मुख्य गुण जुळले तर त्यांचा विवाह आनंदी आणि यशस्वी मानला जातो. पण, हे ३६ गुण कोणते आणि लग्न जुळवण्यासाठी ३६ पैकी किती गुण जुळले पाहिजेत याविषयी जाणून घेऊ..

लग्न जुळण्यासाठी पाहिले जातात कुंडलीतील ‘हे’ ३६ गुण

नक्षत्र : हा गुण वैवाहिक जीवनात आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो.
वृद्धी : जीवनात वाढ, समृद्धी आणि आनंद आणणारा गुण.
संतती सुख : संतती सुखाच्या संकेत, संतान प्राप्तीसाठी चांगला काळ.
ग्रह : ग्रहांचा प्रभाव, वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती.
बंधुत्व : भाऊ-बहिणीच्या नात्याची स्थिती.
नक्षत्र : जीवनातील शुभ आणि अशुभ गोष्टी दर्शविणाऱ्या नक्षत्रांचा मेळ.
नाडी : ही गुणवत्ता आरोग्य आणि जीवनाच्या प्रमुख पैलूंचे प्रतिनिधित्व करते.
राशी चक्र : लग्नासाठी राशी चिन्ह जुळवणे महत्त्वाचे मानले जाते.
स्वभाव : दोन्ही जोडीदारांच्या स्वभावात साम्य.
धन : आर्थिक स्थिती आणि समृद्धीच्या बाबत
धर्म : धर्म आणि नैतिक मूल्यांचे संयोजन.
कुल : कुटुंब आणि वंशाचा सन्मान.
योग : जीवनात चांगल्या संधी आणि भाग्य जुळण्याची स्थिती.
मालमत्ता : मालमत्ता आणि संपत्तीची स्थिती.
वर्तन : एकमेकांशी वर्तन आणि सुसंवाद.
आरोग्य : दोन्ही जोडीदारांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य.
समजूतदारपणा : विचार आणि समजुतीची समानता.
आत्मविश्वास : दोन्ही जोडीदारांचा आत्मविश्वास.
शारीरिक आकर्षण : शारीरिक आकर्षणाचे संयोजन.
वेळ : कालांतराने एकमेकांशी संवाद.
मैत्री : परस्पर मैत्री आणि समजूतदारपणा.
संघर्ष : जीवनातील संघर्षांचे सामूहिक निराकरण.
कुटुंबाचा पाठिंबा : कुटुंबाकडून पाठिंबा आणि सहकार्य.
आध्यात्मिक : आध्यात्मिक कल्पना आणि समज यांचे संयोजन.
सभ्यता : परस्पर आदर आणि नम्रता.
भावना : योग्य मार्गाने भावनांचा आदर करणे आणि त्या सामायिक करणे.
समर्पण : एकमेकांप्रती भक्ती आणि वचनबद्धता.
आळस : आळसाचा अभाव आणि आनंदी वृत्ती.
धैर्य : एकमेकांना प्रेरणा देणे आणि धैर्य निर्माण करणे.
सद्भावना : परस्पर समंजसपणा आणि सद्भावना यांचे संयोजन.
संकल्प: जीवनातील ध्येये आणि संकल्पांचे संयोजन.
मनोरंजन : एकमेकांसोबत वेळ घालवण्याची इच्छा आणि उत्साह.
समजूतदारपणा : परस्पर समजूतदारपणा आणि कल्पना जुळणे.
आनंदी जीवन : जीवनात आनंद आणि समाधानाची भावना.
प्रेरणा : एकमेकांना प्रेरणा देण्याची क्षमता.
सकारात्मकता : सकारात्मक दृष्टिकोनांचे संयोजन.

विवाह यशस्वी होण्यासाठी कुंडलीतील किती गुण जुळणे आवश्यक?

ज्योतिषशास्त्रानुसार, जर वधू आणि वराच्या कुडुंलीतील ३६ गुणांपैकी १८ वर्षांपेक्षा कमी असतील तर असा विवाह असफल ठरतो. जर एखाद्या व्यक्तीचे १८ ते २५ गुण जुळत असतील तर ते विवाहासाठी फलदायी मानले जाते. तर जर २५ ते ३२ गुण जुळले तर विवाहासाठी हे शुभ मानले जाते. अशाप्रकारे २५ ते ३२ गुण जुळले तर त्यांचा विवाह यशस्वी होऊ शकतो. जर एखाद्या वधू- वराचे ३२ ते ३६ गुण जुळले असतील तर ते खूपच शुभ मानले जाते, याला यशस्वी विवाह म्हणतात.

१८ पेक्षा कमी गुण जुळणे- लग्नासाठी योग्य नाही,
१८ ते २५ गुण जुळले – लग्नासाठी योग्य
२५ ते ३२ गुण जुळले- यशस्वी विवाह.
३२ ते ३६ गुण जुळले- विवाहासाठी सर्वोत्तम मानले जाते, अशाप्रकारे गुण जुळणे अत्यंत दुर्मीळ असते.

लग्नासाठी किती गुण आवश्यक असतात?

ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितले की, वधू आणि वराचे किमान १८ गुण जुळले तर ते लग्नासाठी चांगले मानले जाते. एकूण ३६ गुणांपैकी जर १८ ते २१ गुण जुळले तर जुळणी मध्यम मानली जाते. जर जास्त गुण जुळले तर त्याला शुभ विवाह जुळणे म्हणतात. कोणत्याही वधू आणि वराचे ३६ गुण जुळले तर ते अत्यंत दुर्मीळ मानले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धार्मिक मान्यतेनुसार, फक्त भगवान श्रीराम आणि सीता मातेच्याच कुंडलीतील ३६ गुण जुळले होते. ज्योतिषांनी सांगितले की, जर वधू- वराच्या कुंडलीतील ३६ गुणांपैकी १८ गुणांपेक्षा कमी गुण जुळत असतील म्हणजे १७ गुण जुळत असतील तर त्यांनी लग्न करू नये. असे लग्न असफल ठरू शकते.

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम त्याची पुष्टी करत नाही,)