औरंगाबाद जालना रोडवरील केम्ब्रिज चौकात टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात भारतीय राखीव बटालियनमधील एका जवानासह चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. किशोर दादासाहेब थोटे ( २७ ) आणि कावेरी राजू दहीहंडे अशी मृतांची नावे आहेत.

पैठण तालुक्यातील थेरगावचे किशोर थोटे एसआरपीमध्ये कार्यरत होते. मेहुणी आणि तिच्या मुलीसह आजी सासूच्या अस्थी विसर्जनासाठी जात असताना आडगाव येथे हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर जखमी अवस्थेत जवानासह चिमुकलीला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातामध्ये कावेरी राजू दहीहंडे या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.