उद्यापासून (मंगळवार) सुरू होत असलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागीय मंडळातून १ लाख ८१ हजार ५७८ परीक्षार्थीनी नोंद केली आहे. २९ मार्चपर्यंत होणाऱ्या या परीक्षेची विभागीय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने जय्यत तयारी केली आहे.
औरंगाबाद जिल्हय़ातून सर्वाधिक ६४ हजार ६६८ परीक्षार्थी असून, यात ३७ हजार ३८९ विद्यार्थी, तर २७ हजार २७९ विद्यार्थिनी आहेत. बीड जिल्हय़ातून ४२ हजार ४०, परभणी २९ हजार ३०, जालना २९ हजार १४१, तर हिंगोली जिल्हय़ातून १६ हजार ६९९ परीक्षार्थी आहेत. औरंगाबादेत ७८४ माध्यमिक विद्यालयांसाठी २०२ परीक्षा केंद्रे आहेत. बीड ६३६ विद्यालयांसाठी १४५ परीक्षा केंद्रे, जालना ३६५ विद्यालये ८४ परीक्षा केंद्रे, परभणी ४२३ विद्यालये ८६ परीक्षा केंद्रे, तर हिंगोली २०७ विद्यालये ४५ या प्रमाणे विभागात एकूण ५६२ परीक्षा केंद्रे आहेत. एकूण परीक्षार्थीमध्ये १ लाख ७४ हजार २७७ नियमित, तर ७ हजार ३०१ पुनर्परीक्षार्थी आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2016 रोजी प्रकाशित
दहावी परीक्षेची जय्यत तयारी
उद्यापासून (मंगळवार) सुरू होत असलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची विभागीय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने जय्यत तयारी केली आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 01-03-2016 at 01:32 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10th exam full preparation