रोहनच्या मामाचं लग्न होतं त्यामुळे आठ दिवस सगळ्यांची चैन होती. आज लग्नाचं सूप वाजल्यामुळे सगळे घराकडे परतत होते. गाडीत बसणार एवढ्यात रोहनला तहान लागली. ‘‘आई, पाणी दे ना.’’ रोहनने आईकडे मोर्चा वळवला. आई आधीच खूप दमली होती. ‘‘जा घरात जाऊन पाणी पिऊन ये पटकन.’’ आईनं सांगताच रोहन घरातून छोटी पाण्याची बाटली घेऊन आला. घोटभर पाणी प्यायला आणि ‘‘आई ही बाटली ठेव,’’ म्हणत घाईघाईने ड्रायव्हरशेजारी बसला. दुसरे काही उद्याोग सुचले नाही की ‘पाणी’ हे रोहनचं नाटक आईला माहिती होतं.

‘‘रोहन पाण्याची बाटली ठेव तुझ्याजवळ. पुन्हा लागेल तुला.’’ चुळबुळ्या रोहनला बाटली सांभाळायची नव्हती. त्यानं बाटलीतील पाणी ओतून टाकण्याचा खेळ केला आणि बाटली फेकून दिली. शांतपणे बसून राहिलेल्या आजीच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्या वेळी ती काही बोलली नाही इतकंच. दोन-चार दिवसांनी शाळेतून आल्यावर आजी आणि रोहनच्या गप्पा रंगात आल्या होत्या.

Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Tourism to Prosperity Nifty India Tourism Index print eco news
पर्यटनातून समृद्धीकडे…:  निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स
Loksatta kalakaran Gandhi Jayanti Gandhiji ​non violent satyagrah
कलाकरण: बंदुकीच्या अल्याडपल्याड…
bike taking petrol fire
पेट्रोल भरताना बाईकचालकाच्या कोणत्या चुकीमुळे आग लागते? अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर
transplant artificial limb for injured cow in mumbai
जखमी गायीला कृत्रिम पाय; प्रत्यारोपणाची पहिली आणि यशस्वी शस्त्रक्रिया
सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या
Mumbai: Leopard Spotted Rolling & Relaxing In Bushes Of Aarey Milk Colony
VIDEO: मुंबईतील ‘आरे’मध्ये दिसला बिबट्या अन्…; मध्यरात्री बिबट्या रस्त्याच्या कडेला काय करत होता पाहा

हेही वाचा…सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!

आजी म्हणाली, ‘‘रोहन, तुला एक गोष्ट सांगायची आहे कधीपासून, ये आत्ताच सांगते.’’
रोहन उड्या मारत आजीच्या मांडीवरच येऊन बसला. ‘‘अरे, परवा मी भंगार गोळा करणाऱ्या बाईला पाहिलं.’’ ‘मग त्यात काय विशेष’ असे भाव रोहनच्या चेहऱ्यावर उमटले होते.

‘‘अरे, तिच्या पोत्यातून पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा ढीग काढला तिनं.’’
‘‘रिकाम्या बाटल्या टाकूनच द्यायच्या असतात ना आजी.’’ रोहन पुटपुटला.

‘‘हो रे, तिचं ते कामच होतं, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करायचं. ते तिनं केलं. ते करताना तिच्या लक्षात आलं की त्या प्रत्येक बाटलीत थोडं थोडं पाणी आहे. तू ओतलंस, तसं तिनं तिथंच ओतून टाकलं असतं तरी चाललं असतं; पण तिनं ते रस्त्यावर ओतून दिलं नाही.’’
‘‘काय केलं आजी तिनं?’’ रोहन लक्ष देऊन ऐकू लागला.

हेही वाचा…बालमैफल: क्रांतीचे प्रतीक

‘‘तिनं आजूबाजूच्या कुंड्यांमधील रोपं, झाडं यांच्या मुळाशी एकेक बाटली रिकामी केली. दुसऱ्याला काही तरी खाऊ देताना कौतुकाचा, आनंदाचा भाव असतो ना चेहऱ्यावर, तसाच भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. झाडांना तिनं पाणी पाजलं. पाणी म्हणजे जीवन. जणू त्या हरित सृष्टीला जीवनच बहाल केलं. त्यासाठी आपला वेळ दिला. वाढीव कामच तिनं केलं- तेही स्वत: अर्धपोटी असताना. या हिरव्या सोयऱ्यांची तिनं काळजी घेतली. त्यांना त्यांचा खाऊ दिला आणि हे करताना पाण्याचा अपव्यय टाळला. ते फुकट जाऊ दिलं नाही. पाण्याचं महत्त्व तिनं ओळखलं होतं. पाणी वाचवताना झाडंही वाचवली होती. ही जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का? खरं तर ती बाई अशिक्षित, निरक्षर तिला वर्तमानपत्र वाचता येत नाही. ‘जलसाक्षरता’ हा शब्दही तिला माहीत नाही. तिला कोणीही पाण्याचं महत्त्व सांगितलेलं नाही. पाऊस कमी पडलाय, तलावांमधील पाण्याची पातळी खाली घसरलेली आहेत, हेही तिला माहीत नाही. तरी ‘विवेका’नं तिनं ही गोष्ट केली. खरं तर आपल्यासारख्या सुशिक्षितांपुढे नकळत आदर्श उभा केला आहे. बरोबर बोलते आहे ना मी रोहनशेठ. आजीनं हळूच टपली मारल्यावर रोहन उभा राहिला.

हेही वाचा…बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा

‘‘आजी माझं थोडं चुकलं बरं का! मी पुन्हा असं पाणी ओतून देणार नाही.’’

आजीचा हेतू साध्य झाला होता.

suchitrasathe52@gmail.com