अंकिता कार्ले

एका गावात एक मोठं तळं होतं. त्यात खूप मासे होते. छोटे मासे, मोठे मासे. मस्त रंगीत होते ते. त्या तळय़ाचं पाणी खूप स्वच्छ होतं. त्या जलाशयात ते मासे छान खेळत असत एकमेकांशी. मधूनच त्यातील काही मासे, जे मोठे होते- म्हणजे दादा मासे बरं का!- ते पाण्यातून वर उडी मारत व झुपकन् परत पाण्यात शिरत. ते पाहून लहान माशांना खूप मज्जा वाटे. त्याच तळय़ात एक कासव आणि एक बेडूकसुद्धा होतं; पण ते उभयचर असल्यामुळे ते कधी तळय़ात राहत किंवा तळय़ाच्या बाहेर राहत. पण ते मासे, ते कासव आणि तो बेडूक यांची खूप घट्ट मैत्री होती. ते एकत्र खेळत, दंगा करत, गप्पा मारत आणि प्रसंगी एकमेकांना मदतही करत.

bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

एक दिवस काय झालं, तिथे एक मासे पकडणारा आला. ते तळं, त्यातील मासे पाहून त्यानं ठरवलं की, आपण मासे पकडायचे. त्यानं जाळं पाण्यात टाकलं आणि मासे त्यात अडकावेत म्हणून त्यानं काय युक्ती केली माहिती आहे का? त्या जाळय़ाशी त्यानं खाऊ ठेवला व ते पाण्यात टाकून निवांत बसला पाण्यात पाय सोडून. थोडय़ा वेळानं काही मासे त्यात अडकले. कारण त्या माशांना वाटलं, हा आपल्यासाठीच आहे खाऊ व तो घेण्यासाठी ते तिथे आले आणि त्या जाळय़ात अडकले. त्या दिवशी मासे पकडणारा खूप खूश झाला. त्यानं ठरवलं की, आता रोज इथे यायचं आणि हे छान छान मासे पकडायचे आणि नंतर ते मस्त खाऊन टाकायचे.

ठरल्याप्रमाणे तो तेथे येऊ लागला. मासे पकडू लागला. हळूहळू माशांची संख्या कमी होऊ लागली. उरलेल्या माशांना आता त्याची भीती वाटू लागली. त्यांचे किती तरी मित्र त्यानं खाऊन टाकले होते. तेव्हा त्यांनी ठरवलं की, आता त्या माणसाला आपण फसायचं नाही. एकत्र मिळून काही तरी युक्ती करू आणि त्यावर मार्ग काढू. त्यांच्या या योजनेत कासव आणि बेडूक त्यांना मदत करणार होते.

एके दिवशी एका माशाला एक युक्ती सुचली, त्यानं इतर माशांना, कासवाला आणि बेडकाला बोलावलं. तो म्हणाला, ‘‘जेव्हा शिकारी माणूस जाळं सोडेल तेव्हा त्याच्या त्या जाळय़ाजवळ चुकूनही जायचं नाही. आपण सावध राहायचं. आपल्याला माहिती आहे की, तो सकाळी कधी येतो ते, तेव्हा सगळय़ांनी सावध राहायचं. त्यानंतर त्याच्या जाळय़ात एक मोठा दगड ठेवून द्यायचा; पण तो दगड ठेवायला इतर मासे, कासव आणि बेडूक तुम्ही मदत करायची म्हणजे आपण सुरक्षित राहू. तो शिकारी माणूस जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा आपण हेच करायचं. म्हणजे तळय़ातील मासे संपले असं त्याला वाटेल आणि तो कायमचा निघून जाईल.. परत इकडे येणारही नाही.’’ अर्थातच सगळय़ांना ही योजना पटली आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी ती पार पडली.

थोडय़ा दिवसांनी खरंच त्या शिकारी माणसाचं येणं बंद झालं. रोज रोज दगड जाळय़ात सापडल्यानं त्याला खरंच वाटलं की, आता इथले मासे संपले आहेत असं. आणि तो पुढे दुसऱ्या गावी निघून गेला. त्या दिवशी सगळे मासे, कासव, बेडूक खूप खूश झाले. त्यांच्या एकजुटीचा विजय झाला होता. आता परत ते पहिल्यासारखे मुक्त झाले होते- बागडायला, खेळायला. शेवटी कुठलंही काम एकत्रपणे केलं की यशस्वीच होतं.. जेव्हा आपले मित्र अडचणीत असतात तेव्हा त्यांना मदत केली की त्याचा आनंद वेगळाच असतो- जो कासव आणि बेडकाने अनुभवला. अशा प्रकारे त्या साऱ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या अडचणीवर मात केली आणि आनंदाने राहू लागले.