Reliance Industries: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे ७ वी बंगाल ग्लोबल बिझनेस समीट सुरू आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज जैवइंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी हरित हायड्रोजन धोरण जाहीर केले. भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या ग्लोबल बिझनेस समीटमध्ये पश्चिम बंगालमध्ये २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक पुढील तीन वर्षांत केली जाणार आहे. मुकेश अंबानी म्हणाले, “रिलायन्स बंगालच्या विकासात कोणतीही कसर सोडणार नाही. आतापर्यंत रिलायन्सने बंगालमध्ये सुमारे ४५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आम्ही पुढील ३ वर्षांत २० हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करू.”

पश्चिम बंगालसाठी रिलायन्स जिओची ही योजना

आशियातील आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी सांगितले की, २० हजार कोटी रुपयांची ही गुंतवणूक टेलिकॉम, रिटेल आणि बायो एनर्जी क्षेत्रात केली जाणार आहे. आम्ही 5G राज्याच्या कानाकोपऱ्यात घेऊन जात आहोत, विशेषत: ग्रामीण बंगालला जोडले जात आहे. Jio True 5G नेटवर्क बंगालच्या बहुतांश भागात पोहोचले आहे आणि आम्ही बंगालमधील बहुतांश भाग कव्हर केला आहे. Jio च्या नेटवर्कमध्ये राज्यातील ९८.८ टक्के लोकसंख्या आणि कोलकाता टेलिकॉम सर्कलमधील १०० टक्के लोकसंख्या समाविष्ट आहे. जिओचे मजबूत नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारासह शिक्षण, आरोग्यसेवा आणि शेतीला प्रोत्साहन देणार आहे.

developers become owner of sra plot under provision in new housing policy
‘झोपु’तील भूखंडाची विकासकांना मालकी? नव्या गृहनिर्माण धोरणात तरतूद, हरकतींसाठी आजपर्यंतच मुदत
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
infrastructure growth slips in august
पायाभूत क्षेत्रांच्या वाढीला घरघर; साडेतीन वर्षात पहिल्यांदाच नकारात्मक; ऑगस्टमध्ये उणे १.८ टक्क्यांपर्यंत अधोगती
‘सेबी’कडून सहा गुंतवणूक बँकांची चौकशी; छोट्या कंपन्यांच्या ‘आयपीओ’ प्रक्रियेत सहभागाचा दावा
‘सेबी’कडून सहा गुंतवणूक बँकांची चौकशी; छोट्या कंपन्यांच्या ‘आयपीओ’ प्रक्रियेत सहभागाचा दावा
cyber crimes on name of increasing subscriber likes and followers on social media
सोशल मीडिया युजर्ससाठी महत्त्वाची बातमी… लाईक्स, फालोअर्स आणि सबस्क्राईबर…
Vishal Bariya
इन्फ्रास्ट्रक्चर फंड : स्वयंप्रकाशित तू तारा…
mobile data, Internet, Urban Areas mobile data,
खालमानेतले अनलिमिटेड
Contract recruitment continues through service provider company in government various departments
कंत्राटी भरतीचा पुन्हा धडाका, तीन वर्षे नियमित भरतीची शक्यता धूसर

हेही वाचाः बायजूवर ईडीची धाड, ९ हजार कोटींचा घोटाळा पकडला

पश्चिम बंगालमध्ये जैव इंधन वाढवण्यासाठी हरित हायड्रोजन धोरण

रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी बायोएनर्जी उत्पादक पुढील तीन वर्षांत १०० कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्रे उभारणार आहे. या प्लांटमध्ये ५.५ दशलक्ष टन कृषी कचरा आणि जैव कचरा वापरला जाणार आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन सुमारे २ दशलक्ष टनांनी कमी होण्यास मदत होईल आणि दरवर्षी २.५ दशलक्ष टन जैव खते तयार होतील. मुकेश अंबानी म्हणाले की, आम्ही शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची लागवड करण्यास मदत करू, जेणेकरून ते अन्नदात्यांबरोबर ऊर्जा प्रदाता बनतील आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल.

हेही वाचाः टाटा समूहाच्या ‘या’ कंपनीत नोकरीची संधी, वेगवेगळ्या विभागात ३००० जणांची भरती करणार, जाणून घ्या

रिलायन्स रिटेलची पश्चिम बंगालमध्येही मोठी विस्तार योजना

रिलायन्स रिटेल येत्या दोन वर्षांत पश्चिम बंगालमध्ये सुमारे २०० नवीन स्टोअर्स उघडण्याची योजना आखत आहे. बंगालमध्ये सध्या सुमारे १००० रिलायन्स स्टोअर्स कार्यरत आहेत, ज्यांची संख्या १२०० पर्यंत वाढेल. मुकेश अंबानी म्हणाले की, शेकडो छोटे आणि मध्यम व्यापारी आणि बंगालचे सुमारे ५.५ लाख किराणा दुकानदार आमच्या किरकोळ व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांना नवीन स्टोअर्स सुरू झाल्याचा फायदा होणार आहे. प्रभुजी, मुखरोचक, सिटी गोल्ड, बिस्क फार्म यांसारख्या बंगालच्या अनेक स्थानिक ब्रँड्सचा उल्लेख करून ते म्हणाले की, रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून आम्ही हे ब्रँड संपूर्ण देशात घेऊन जात आहोत.

रिलायन्स फाऊंडेशनतर्फे पश्चिम बंगालमध्ये ही मोठी कामे सुरू

मुकेश अंबानी यांनी आपल्या भाषणात रिलायन्स फाऊंडेशनकडून पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या कामांचाही उल्लेख केला. कोलकात्यातील प्रसिद्ध कालीघाट मंदिराचे जीर्णोद्धार आणि पुनरुज्जीवन हे यातील सर्वात महत्त्वाचे आहे. या शतकानुशतके जुन्या मंदिराच्या दुरुस्तीचे आणि सुशोभीकरणाचे काम रिलायन्स फाऊंडेशन करत आहे. फाउंडेशनच्या ‘स्वदेश’ उपक्रमांतर्गत भारतातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पारंपरिक कला आणि हस्तकलेचा भारतात आणि जागतिक स्तरावर प्रचार केला जात आहे. रिलायन्स फाऊंडेशन राज्य सरकारच्या सहकार्याने बंगालमधील कारागिरांच्या तरुण पिढीसाठी एक प्रशिक्षण संस्था तयार करणार आहे. याशिवाय रिलायन्सच्या रिटेल चॅनेलवर विणकर, कारागीर आणि हस्तकलाकारांची उत्पादने विकण्यासाठी फाउंडेशनसाठी ‘बिस्वा बांगला कॉर्पोरेशन’बरोबर करार करण्यात आला आहे.