मुंबई : चुकीच्या धोरणांमुळे बँकांपुढे मोठे संकट निर्माण होऊ शकते, हे पाहता देशाच्या बँकांच्या व्यवसाय प्रारुपावर रिझर्व्ह बँकेचे बारकाईने लक्ष आहे, असा निर्वाळा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी येथे दिला.

एका कार्यक्रमात बोलताना दास म्हणाले की, नजीकच्या काळातील चिंताजनक घडामोडी या अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्यानंतर सुरू झाल्या. संपूर्ण व्यवस्थेवर आलेला ताण कमी करण्यासाठी खूपच धावाधाव करावी लागली. सदोष व्यवसाय प्रारुपामुळेच हे संकट निर्माण झाले असण्याची शक्यता आहे. काही विकसित अर्थव्यवस्थांमध्ये नजीकच्या काळात वित्तीय अस्थिरतेचे प्रकार दिसून आले. त्याचा भारतीय बँकांवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही. भारतीय बँका व्यवस्थितपणे कार्य करीत आहेत.

Retrenchment of staff by Hindu Muslim hotel owners in uttar Pradesh
हिंदू-मुस्लीम हॉटेल मालकांकडून कर्मचारी कपात
Bhayander, Former corporators, video
भाईंदर : माजी नगरसेविकांचा गोव्यातील व्हिडीओ व्हायरल, कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात घेराव
Loksatta kutuhal The maker of the artificial intelligence chip in the brain
कुतूहल: मेंदूतील कृत्रिम बुद्धिमत्ता चिपचा निर्माता
loksatta analysis reason behind cbi raid on neeri 4 state including in nagpur
विश्लेषण : नीरी’ संस्थेवरील सीबीआय छाप्यांमुळे खळबळ का उडाली? संचालकानेच संस्थेचे मातेरे कसे केले?
article about mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा – बुद्धिमत्ता चाचणी
Masoud Pezeshkian reformist president elected by Iranian people overturning the established system will give new direction to Iran
कर्मठ व्यवस्थेस वाकुल्या दाखवत इराणी जनतेने निवडला सुधारणावादी अध्यक्ष… मसूद पेझेश्कियान इराणला नवी दिशा देतील का?
The role of SEBI  SAT is important to maintain investment friendly environment
‘गुंतवणुकीस्नेही वातावरण राखण्यास सेबी, सॅटची भूमिका महत्त्वपूर्ण’; बाजारातील उधाणाबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सावधगिरीचा इशारा
on call a doctor s journey in public service
चाहूल : रोगांच्या सावटातल्या अमेरिकेचा साथी…

हेही वाचा – ‘इन्कोव्हॅक’ लस आजपासून; मुंबई महापालिकेतर्फे २४ केंद्रांवर नाकाद्वारे लसीकरण

अमेरिकेतील अलीकडच्या या घडामोडी पाहता अडचणीत आलेल्या बँकांची व्यवसाय पद्धती योग्य की अयोग्य असा मुद्दाही उपस्थित झाला होता. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने भारतीय बँकांच्या व्यवसाय प्रारुपाला बारकाईने तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यात जर त्रुटी राहिल्यास त्यातून संकट निर्माण होऊ शकते, असे दास यांनी सांगितले.

अनुत्पादित कर्जांमध्ये घटबँकांच्या एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण कमी होऊन डिसेंबर २०२२ मध्ये ४.४१ टक्क्यांवर आले. ते मार्च २०२२ मध्ये ५.८ टक्के, तर मार्च २०२१ मध्ये ७.३ टक्के होते. भारतीय बँकांकडील भांडवल उपलब्धता डिसेंबर २०२२ अखेर १६.१ टक्के होती. किमान गरजेपेक्षा हे प्रमाण जास्त आहे, असे शक्तिकांत दास यांनी नमूद केले.

हेही वाचा – मुंबई :‘बेस्ट’मध्ये मोबाइलचा मोठा आवाज बंद !स्पीकरवर गप्पा, गाणी ऐकल्यास पोलिसांत तक्रार

बँकेच्या व्यवसाय पद्धतीमुळे तिच्या ताळेबंदातील काही भागांत जोखीम निर्माण होऊ शकते. त्यातूनच पुढे जाऊन मोठे संकट निर्माण होते, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.