यूपीएससीची तयारी

जगाचा आणि भारताचा भूगोल : मागील लेखामध्ये आपण भूगोल या विषयाचे स्वरूप, त्यातील विविध घटक याविषयी माहिती घेतली. आजच्या लेखामध्ये आपण या विषयाचा परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी नेमक्या कोणत्या संदर्भग्रंथाचा वापर करावा लागतो तसेच ‘एनसीईआरटी’ची भूगोल विषयाच्या कोणत्या इयत्तेच्या पुस्तकांचा उपयोग परीक्षेच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरू शकेल याची मागे विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या आधारे या लेखात चर्चा करणार आहोत.

एनसीईआरटीची क्रमिक पुस्तके विषयाच्या मूलभूत आकलनासाठी भूगोल याविषयाचे मूलभूत ज्ञान प्राप्त करण्यासाठी एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांचा वापर करणे अधिक श्रेयस्कर ठरेल, नेमक्या कोणत्या इयतेच्या पुस्तकांचा वापर करावा लागतो हा महत्त्वाचा प्रश्न आपल्यापुढे असतो. तसे पाहता इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व पुस्तकांचा वापर करावा लागतो पण मुख्य परीक्षेच्या दृष्टीने Contemporary Indi (STD-IX,X), Fundamentals of Physical Geography (I), Indian Physical Environment(XI), Fundamentals of Human Geography (XII), India- People and Economy (XII)

इत्यादी पुस्तकांचा वापर उपयुक्त ठरतो. एनसीईआरटीची पुस्तके अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेली असल्यामुळे हा विषय समजणे तितकेसे कठीण जात नाही.

संदर्भ साहित्य

उपरोक्त नमूद केलेली पुस्तके शालेय विध्यार्थ्यांसाठी लिहिलेली असल्यामुळे या विषयाची परीक्षेच्या दृष्टीने र्सवकष आणि सखोल तयारी करण्यासाठी आपणाला एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांबरोबरच बाजारात उपलब्ध असणाऱ्या संदर्भग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. बाजारात या विषयाचे अनेक संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या दोन्ही घटकांवर बाजारात स्वतंत्ररीत्या अनेक संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. सदर घटकाचा अभ्यास करण्यासाठी पुढे नमूद केलेल्या संदर्भग्रंथाचा उपयोग होईल.

Certificate Physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), India – Comprehensive Geography ( by D.R. Khullar) World Geography (by Majid Husain) , World Regional Geography (Tikha, Bali, Sekhaon)इत्यादी.

या संदर्भग्रंथांचा उपयोग भूगोल विषयाची र्सवकष आणि सखोल तयारी करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.

या संदर्भग्रंथाचा वापर या विषयाच्या अभ्यासक्रमाचे विभाजन घटकनिहाय पद्धतीने करून केल्यास अधिक फायदा होतो. कारण एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांचे वाचन केल्यामुळे या विषयाचे मुलभूत ज्ञान प्राप्त होते तर गतवर्षीच्या प्रश्नांच्या विश्लेषणाचा आधार घेतल्यास अधिक योग्यपणे या संदर्भग्रंथाचा वापर करता येईल.

गेल्या वर्षीचे प्रश्न आणि प्रश्ननिहाय उपयुक्त असे संदर्भसाहित्य

२०१४ च्या मुख्य परीक्षेमध्ये उष्णदेशीय चक्रीवादळे ही दक्षिण चीनी समुद्र, बंगालचा उपसागर आणि मेक्सिकोचे आखात यासारख्या प्रदेशात मोठय़ाप्रमाणत मर्यादित असतात कारण, हा प्रश्न विचारण्यात आला होता. थोडक्यात या प्रश्नाचे आकलन होण्यासाठी उष्णप्रदेशीय चक्रीवादळांची सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. तसेच हा प्रश्न जगातील तीन विविध प्रदेशांच्या प्राकृतिक रचनेशी संबंधित आहे. त्यामुळे नेमके कोणते प्राकृतिक घटक यासाठी जबाबदार आहेत याचीही माहिती असावी. यासाठी उपरोक्त नमूद केलेल्या जवळपास सर्व संदर्भग्रंथांचा वापर करता येतो. तसेच मुख्य परीक्षेचा विचार करता भारताचा भूगोल या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारण्यात येतात. यात भारताच्या प्राकृतिक, लोकसंख्या, सामाजिक व आíथक घटकाशी संबंधित प्रश्न असतात. या सर्व घटकांची सविस्तर माहिती देणारा ग्रंथ  India – Comprehensive Geography ( by D.R. Khullar)

आहे. म्हणून भारताच्या भूगोलवर सर्वाधिक भर परीक्षेच्या दृष्टीने द्यावा लागतो. या व्यतिरिक्त जगाच्या भूगोलवर देखील प्रश्न विचारले जातात. २०१५ च्या मुख्य परीक्षेमध्ये महासागरीय प्रवाहाच्या उगमासाठी जबाबदार असणारे घटक स्पष्ट करा. तसेच हे प्रवाह प्रादेशिक हवामान, मासेमारी आणि जलवाहतूक यावर काय प्रभाव टाकतात, हा प्रश्न विचारण्यात आलेला होता व हा प्रश्न प्राकृतिक आणि आíथक या दोन्ही पलूंचा आधार घेऊन विचारण्यात आलेला होता. यासाठी उपरोक्त नमूद केलेल्या

Certificate physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), World Geograhy (by Majid Husain)

इत्यादी संदर्भग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. याच बरोबर या विषयाशी संबंधित चालू घडामोडींचाही अभ्यास करावा लागतो ज्यामध्ये मुखत्वे आíथक आणि सामाजिक भूगोल तसेच प्राकृतिक घटकाचा समावेश होतो व यासाठी ‘द हिंदू’ आणि ‘द इंडियन एक्स्प्रेस’ यासारखी वर्तमान पत्रे, योजना, कुरुक्षेत्र आणि डाऊन टू अर्थ यासारख्या मासिकांचा वापर उपयुक्त ठरतो. उदारणार्थ २०१५ च्या मुख्य परीक्षेमध्ये मुंबई, कोलकाता आणि दिल्ली ही देशातील तीन महानगरे आहेत पण यामध्ये दिल्लीमधील वायुप्रदूषण हे मुंबई व कोलकाता या महानगरांच्या तुलनेत अधिक असून एक गंभीर समस्या आहे व हे असे का आहे? हा प्रश्न विचारलेला होता. तसेच २०१६ मध्ये दक्षिण चिनीसमुद्र व त्याचे महत्त्व, २०१७ मध्ये कोळसा खाणींची विकासासाठी असणारी अपरिहार्यता आणि याचे प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम असे प्रश्न विचारण्यात आलेले होते जे पारंपरिक ज्ञान, चालू घडामोडी यांची सांगड घालून विचारण्यात आलेले होते.