विज्ञान आश्रम, पाबळ, जि. पुणे
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळायला हवे आणि त्यासाठी त्यांना हाताने काम करण्याची संधी मिळायला हवी, याकडे जगभरात सुरू असलेल्या शिक्षणविषयक संशोधनांचा रोख आहे. कार्यकेंद्री शिक्षण म्हणजे नेमके काय, त्याचा समावेश शालेय शिक्षणात कसा करता येईल आणि त्याची उपयुक्तता याचे सविस्तर विश्लेषण करणारी लेखमाला-
‘प्रत्यक्ष हाताने काम करणे’ आपल्याकडे नेहमीच कमी दर्जाचे मानले जाते. कारकुनी, कार्यालयीन कामाला आपण श्रेष्ठ मानतो. खरे तर संशोधक, अंतराळ वीर शल्यचिकित्सा करणारे डॉक्टर, कलाकार इ. अनेक यशस्वी व्यक्तींच्या यशामध्ये त्यांचा कौशल्याचा फार मोठा वाटा असतो. ही कौशल्ये केवळ पुस्तकी ज्ञानातून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने विकसित होतात. विद्यार्थ्यांमधील धडपड करण्याची वृत्ती, कृतिशीलता, उपक्रमशीलता इ. अनेक गुण विकसित होण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष हाताने काम करण्याची संधी मिळायला हवी. कामावर आधारलेले शिक्षण हे केवळ गरीब विद्यार्थाना रोजगार मिळविण्यासाठी वा अभ्यासात गती नसलेल्यांसाठी असा गरसमज आहे. हाताने काम करण्याचे बौद्धिक विकासासाठी असलेले महत्त्व आपण समजावून घेतले पाहिजे.
पाबळ गावामध्ये उद्यानाची निर्मिती
विज्ञान आश्रम, पाबळ येथे ग्रामीण तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम राबविला जातो. पाबळ गावात मुलांना खेळण्यासाठी, निवांतपणे पुस्तके वाचण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी किंवा सहज फिरण्यासाठी चांगली जागा नाही हा प्रश्न तीन महिन्यांपूर्वी चच्रेत आला व चच्रेअंती अशा उद्यानाची निर्मिती हा प्रकल्प म्हणून निवडण्यात आला. उद्यानाचे स्वरूप कसे असावे, जागा कुठे असावी, कुठल्या गोष्टी असाव्यात, काळजी काय घ्यावी, अंदाजे खर्च किती येईल यावर चर्चा झाली. इंटरनेटवरून विविध बागा व त्यांचे डिझाइन याचा अभ्यास केला गेला. स्थानिक उपलब्ध मटेरियल व भंगार यांच्या याद्या झाल्या. विद्यार्थ्यांनी प्रस्तावित जागेचे संकल्पचित्र तयार केले. त्यासाठी ‘गूगल स्केच’ हे सॉफ्टवेअर त्यांना शिकावे लागले. उपलब्ध जागेत काम करताना त्याचे मापन, ड्रॉइंग, क्षेत्रफळ काढणे इ. अनेक गोष्टी विद्यार्थी शिकले. उद्यानातील निवारा छत्रीचे डिझाइन करताना बल, कार्य, लोड, दाब, इ. अनेक अभ्यासक्रमातील भाग शिक्षकांनी स्र्६ी१स्र््रल्ल३ च्या माध्यमातून शिकवला. बागेसाठीची खेळणी बनविण्यासाठी विद्यार्थाना वेिल्डग वर्कशॉपमधील मशीन्स वापराव्या लागल्या. कमी पाण्यात तग धरतील अशी झाडे शोधून त्यांचे योग्य वृक्षारोपन विद्यार्थ्यांनी केले. बांबूवर प्रक्रिया करून त्यापासून प्रवेशद्वार केले गेले. स्थानिक माती, दगड, वाळवलेली लाकडे यापासून विविध रंग वापरून सजावट करता आली. वेगवेगळ्या विषयातील १० धडे पूर्ण करत व काम करत ४० विद्यार्थ्यांनी दोन महिन्यांत बाग तयार केली. सर्वात शेवटी सर्वानी आपल्या भाषेत अनुभव लिहिले. बागेची निर्मिती करताना विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कौशल्ये मिळवलीच, पण त्याचबरोबर ज्ञान कसे मिळवायचे, प्रश्नांची उत्तरे कशी शोधायची हे ती या कामाबरोबर शिकली. हे सर्व शिक्षण त्यांना अगदी सहजपणे घेता आले. कार्यकेंद्री शिक्षण पद्धतीत आपल्याला असेच शिक्षण शाळांमधून अपेक्षित आहे.
व्यवसाय शिक्षण व कार्यकेंद्री शिक्षण
या दोन्हींमधील फरक आपण नीट समजून घ्यायला हवा. सध्या इयत्ता नववीपासून माध्यमिक स्तरावर ‘व्यवसाय शिक्षणाची’ वेगळी शाखा काढण्याचे प्रस्तावित आहे. शालेय स्तरावरील शिक्षणाचा उद्देश हा केवळ कारखान्यासाठी कुशल कामगार पुरवणे इतका मर्यादित असू नये तर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी कार्यकेंद्री शिक्षणाचा आग्रह आपल्याला धरायला हवा.
सुदैवाने महाराष्ट्रात कार्यकेंद्री संकल्पनेकडे जाणारे अनेक प्रयोग झाले आहेत. मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रम वरील उद्दिष्टांनुसार विकसित झाला आहे. आता गरज आहे, शिक्षण कृतिशील व अर्थपूर्ण बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतून उत्पादक कामात भाग घेण्याची संधी देण्याची!
एकविसाव्या शतकासाठी आवश्यक शिक्षण देण्यासाठी आपल्याला कार्य केंद्रित शिक्षणाचा स्वीकार करायला हवा. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मध्ये म्हटल्यानुसार कार्यकेंद्री शिक्षण पद्धतीची परिणामकारकपणे अंमलबजावणी केल्याशिवाय शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे शक्य होणार नाही.
साहस, उत्तम वेतन आणि सतत परदेश प्रवासाचे योग या तीनही गोष्टींचा एकत्र अनुभव देणाऱ्या गोष्टींचा तुम्ही शोध घेत असाल तर मर्चण्ट नेव्ही हा तुमच्यासाठी योग्य असा पर्याय आहे.
vapabal@gmail.com
व्यवसाय शिक्षण
एका विशिष्ट कौशल्याचे प्रशिक्षण
* विशिष्ट कौशल्याचे प्रशिक्षण कदाचित आयुष्यभर उपयोगी ठरत नाही.
* विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी व चांगले कारागीर तयार व्हावेत, ही अपेक्षा.
* बऱ्याच वेळा व्यवसाय शिक्षण हे फक्त गरीब, कष्टकरी,
उच्च शिक्षण परवडू न शकणाऱ्या, कमी गुण असलेल्या ‘ढ’ (?) मुलांसाठी असा अलिखित पण रूढ समज आहे.
अंमलबजावणीही त्याच प्रकारे केली जाते.
उत्पादक कामातून शिक्षण – कार्यकेंद्री शिक्षण
* सर्व मूलभूत जीवन उपयोगी कौशल्यांचे शिक्षण. मुलांचे अनुभवविश्व वाढवण्यासाठी बहुविध कौशल्यांचे शिक्षण.
* ‘कसे शिकावे’ व नवीन कौशल्य कशी शिकावीत, या क्षमतांच्या विकासावर भर.
* सृजनशील, उपक्रमशील, धडपड करणारा, मानवी मूल्ये बाळगणारा नागरिक बनवणे हे उद्दिष्ट.
शिक्षण शास्त्रातील संशोधनानुसार विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास व्हावा म्हणून सर्व सामाजिक व आर्थिक परिस्थितीतील विद्यार्थ्यांनी ‘हाताने काम करत शिकावे,’ ही भूमिका आहे.