महेश झगडे, निवृत्त सनदी अधिकारी

आपल्याला एखाद्या विशिष्ट क्षेत्रात असलेली गती वेळीच ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. कारण यामुळे भविष्यात नोकरीत आणि आयुष्याच्या प्रवासात विनाअडथळे आनंदाने मार्गक्रमण करता येते. सध्याच्या स्पर्धात्मक जगात तुम्हाला तुमची जीवनकौशल्ये ही बदलत रहावी लागणार आहेत, कारण जागतिक अहवालानुसार चौथ्या औद्योगिक क्रांतीमधील तंत्रज्ञानामुळे पुढील पंधरा ते वीस वर्षांत सद्यस्थितीत असणाऱ्या ६५ टक्के नोकऱ्या कमी होणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, अल्गोरिदम सॉफ्टवेअर्स, मशीन लर्निग आदी विविधांगी तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांमध्ये घट होण्यासह काही प्रमाणात नवीन स्वरूपातील नोकऱ्यांचीही निर्मिती होईल. पण या नोकऱ्यांमध्ये स्थिरता नसेल. तर व्यवसायामध्ये स्थिरता असेल, पण यामध्येही कायमस्वरूपी बदल करावे लागतील ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपण नोकरी व व्यवसायासाठी फक्त महाराष्ट्रापुरती व भारतापुरती मर्यादित नाही राहिले पाहिजे. काळानुसार जागतिक पातळीवरील नोकरीच्या संधींचाही विचार करायला हवा. भारतात कारखानदारी व सेवा क्षेत्रामध्ये जवळपास ४१ ते ४२ कोटी रोजगार आहे. ४५ टक्के रोजगार हा शेतीवरती अवलंबून आहे. कारखानदारी व सेवा क्षेत्रामध्ये ५६ टक्के रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी जास्त आहेत.

Health Care Budget 2024 Key Announcements in Marathi
Health Care Budget 2024 : कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा, जाणून घ्या यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी काय होते खास?
economic survey report says need reforms in agricultural sector
कृषीक्षेत्रात तातडीने सुधारणा करा! संरचनात्मक समस्यांमुळे आर्थिक विकासात अडथळ्याचा इशारा
Sangli, water level, flood affected areas,
सांगली : पाणी पातळी वाढल्याने पूरबाधित क्षेत्रात स्थलांतराचे आवाहन
Loksatta lokrang book raabun nirmiti karnarya poladi baya Stories of eight women of the Ghisadi community
घिसाडी जीवनाचं वास्तव
loksatta analysis how rising of food inflation affect country s economy and credit system
विश्लेषण : उफाळलेल्या खाद्यान्न महागाईचा कर्जहप्त्यांशी काय संबंध?
pli scheme to boost job creation
‘पीएलआय’च्या धर्तीवर रोजगारवाढीशी संलग्न प्रोत्साहनपर तरतुदी अर्थसंकल्पात आवश्यक – आयएमसी
Arm mobile app will work for information about accidental death of wild animals
वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूच्या माहितीसाठी काम करणार ‘आर्म’ भ्रमणध्वनी ॲप
Career Design experiential learning Design Institute
डिझाइन रंग-अंतरंग : डिझाइन : एक ‘अनुभवजन्य’ शिक्षण

भारतामधील ९३ ते ९४ टक्के नोकऱ्या या असंघटित, ६ ते ७ टक्के शासन व संघटित आणि २.७ ते ३ टक्के नोकऱ्या या शासनव्यवस्थेत आहेत. भारतात सर्वाधिक नोकऱ्या या शासकीय यंत्रणेत आहेत. तुमच्यात देशाचा चेहरामोहरा बदलण्याची तळमळ आणि देशसेवा करण्याची इच्छा असल्यास, शासकीय सेवेत येण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. नोकरीची सर्वाधिक हमी ही शासकीय सेवेत आहे. यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून केंद्र सरकार शासकीय सेवेत विविध पदांसाठी भरती करीत असते. बुद्धीचा कस लागणाऱ्या या परीक्षेत प्रचंड स्पर्धात्मक वातावरण असल्यामुळे, विद्यार्थी ताणतणाव तसेच नैराश्यात जातात. यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे ‘प्लॅन बी’ म्हणून पाहिले पाहिजे आणि खासगी क्षेत्रातील नोकऱ्या, व्यवसाय व इतर गोष्टींचा ‘प्लॅन ए’ म्हणून विचार करायला हवा. यामुळे आपले करिअर हे सुरक्षित राहते आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आल्यास आपल्याला ताणतणाव येत नाही. जर स्पर्धा परीक्षांची तयारी ही व्यवस्थित करायची असेल, तर शालेय, माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरापासून इतिहास व इतर विषयांवर प्रभुत्व असण्यासह कष्ट असणे महत्त्वाचे आहे. सूत्रबद्ध आणि सातत्य ठेवून अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणे कठीण नाही.

स्पर्धा परीक्षेत अपयश येत राहिल्यास तिसऱ्या प्रयत्नाच्या पुढे कोणीही जाऊ नये. कारण यामुळे निराशेच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ होत जाते. स्पर्धा परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासामुळे तुमचे ज्ञान वाढून व्यक्तिमत्व विकास होतो. यामुळे कष्ट वाया जात नाहीत. यूपीएससी परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासाच्या जोरावर तुम्ही शासनाच्या इतर ८० ते ८५ टक्के नोकऱ्यांमध्ये यश मिळवू शकतात, यासाठी विशेष अभ्यास करण्याची गरज नसते. तर आपले सरकार हे संयुक्त राष्ट्र संघटना व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या मार्फत आंतराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या नोकरीच्या संधीही उपलब्ध करून देत असते. आपण आयुष्य हे फक्त पैसे कमविण्यासाठी न जगता सुखी राहण्यासासाठी जगले पाहिजे. त्यामुळे आवड व आनंद असलेल्या क्षेत्रात काम केले तर जगण्याचा आनंद द्विगुणित होतो.