डॉ.मिलिंद आपटे
● माझ्या भावाने यावर्षी बारावी सायन्स या शाखेतून बोर्डाचे पेपर दिले आहेत आणि त्याने नीट, एमएचटी सीईटी किंवा जेईई परीक्षा दिलेली नाही. त्याला आधी इंडो जर्मन करायचे होते पण नंतर कळले की याला भविष्यात वाव नसणार. म्हणून त्याने या परीक्षा दिल्या नाहीत. कोणत्या शाखेसाठी/प्रशिक्षणक्रमासाठी प्रवेश घ्यावा याबाबत गोंधळ आहे. कृपया मार्गदर्शन करावे. – – आरती केजभट
● दहावीत किती गुण होते ते कळवले नाहीत त्यामुळे क्षमतेचा अंदाज येत नाही, आता पॉलिटेक्निक डिप्लोमा ला प्रवेश घेऊन पुढे जाता येईल. बारावीच्या नंतर थेट दुसऱ्या वर्षाला डिप्लोमाला प्रवेश घेता येतो, किंवा परत दहावीच्या मार्कांवर पहिल्या वर्षापासून सुरुवात करता येते, दुसरा उपाय म्हणजे बारावीच्या गुणांनुसार बीएससीचा विचार करता येईल पण कोणतेही गुण न कळवल्याने नक्की मार्ग सुचवणे शक्य नाही.
● मी आटपाडी, जिल्हा सांगलीची. माझ्या दोन्ही मुलांनी आता दहावीची परीक्षा दिली आहे. मुलीची इंजिनीअर होण्याची इच्छा आहे. तिचा फोकस पहिल्यापासून क्लिअर आहे. मुलाला कॉमर्समध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. माझा स्वत:चा गेली २५ वर्षे कापड व्यवसाय आहे. मी बारावी नापास आहे. पण व्यवसायात यशस्वी आहे. मुलालाही व्यवसायात इंटरेस्ट आहे. पण गेल्या २५ वर्षांत व्यवसायाच्या बदललेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लागणारे शिक्षण घ्यावे यावर आम्हा दोघांचेही एकमत आहे. मार्केटिंग ,टेक्नॉलॉजी, अकाउंटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, एक्झिक्युशन, स्ट्रॅटेजी यातलं तज्ञ व्हावं व व्यवसाय वेगळ्या उंचीवर न्यावा यासाठी मुलांनी काय करावे? – शितल विठ्ठल मोरे
● आपले विचार आणि मुलांना व्यवसायात प्रगती करण्यासाठी विचारलेले प्रश्न नक्कीच बाकी पालकांना प्रेरणा देतील. कारण सर्व जण उत्तम नोकरी कशी मिळेल याच अनुषंगाने विचार करताना व प्रश्न विचारताना दिसतात, पण तुमच्या मुलांबाबत व्यवसायाबद्दल प्लॅनिंग/ नियोजन नक्कीच कौतुकास्पद आहे.
मुलीच्या इंजीनिअर होण्याच्या इच्छेवर बोलावे तर तिचे दहावीतील गुण आपण कळवलेले नाहीत, गणित आणि विज्ञान मधील गुण व आवड कळल्यास दिशा देता येते, तरी ८० ते ९० असतील तर जेईई सीईटीच्या नादी न लागता पॉलिटेक्निक करून पदवीकडे जावे, मुलाचे सुद्धा गुण कळले असते तर सल्ला नेमका देता येतो, कॉमर्स गणित सोबत घ्यावे की नाही हे दहावीतील गणितावर अवलंबून असते, त्यानुसार निर्णय घ्यावा, त्यानंतर बीकॉम करून एमबीए करावे. त्यावेळी मार्केटिंग, टेक्नॉलॉजी, अकाउंटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, एक्झिक्युशन, स्ट्रॅटेजी या बद्दलचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम असतात ते करावे. खूप आधी पासून हे करू नये. मुलीने इंजीनिअर झाल्यावर पुढील दिशा ठरवावी. खूप शुभेच्छा.
● माझ्या भावाने यावर्षी बारावी सायन्स या शाखेतून बोर्डाचे पेपर दिले आहेत आणि त्याने नीट, एमएचटी सीईटी किंवा जेईई परीक्षा दिलेली नाही. त्याला आधी इंडो जर्मन करायचे होते पण नंतर कळले की याला भविष्यात वाव नसणार. म्हणून त्याने या परीक्षा दिल्या नाहीत. कोणत्या शाखेसाठी/प्रशिक्षणक्रमासाठी प्रवेश घ्यावा याबाबत गोंधळ आहे. कृपया मार्गदर्शन करावे. – – आरती केजभट
● दहावीत किती गुण होते ते कळवले नाहीत त्यामुळे क्षमतेचा अंदाज येत नाही, आता पॉलिटेक्निक डिप्लोमा ला प्रवेश घेऊन पुढे जाता येईल. बारावीच्या नंतर थेट दुसऱ्या वर्षाला डिप्लोमाला प्रवेश घेता येतो, किंवा परत दहावीच्या मार्कांवर पहिल्या वर्षापासून सुरुवात करता येते, दुसरा उपाय म्हणजे बारावीच्या गुणांनुसार बीएससीचा विचार करता येईल पण कोणतेही गुण न कळवल्याने नक्की मार्ग सुचवणे शक्य नाही.
● मी आटपाडी, जिल्हा सांगलीची. माझ्या दोन्ही मुलांनी आता दहावीची परीक्षा दिली आहे. मुलीची इंजिनीअर होण्याची इच्छा आहे. तिचा फोकस पहिल्यापासून क्लिअर आहे. मुलाला कॉमर्समध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. माझा स्वत:चा गेली २५ वर्षे कापड व्यवसाय आहे. मी बारावी नापास आहे. पण व्यवसायात यशस्वी आहे. मुलालाही व्यवसायात इंटरेस्ट आहे. पण गेल्या २५ वर्षांत व्यवसायाच्या बदललेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लागणारे शिक्षण घ्यावे यावर आम्हा दोघांचेही एकमत आहे. मार्केटिंग ,टेक्नॉलॉजी, अकाउंटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, एक्झिक्युशन, स्ट्रॅटेजी यातलं तज्ञ व्हावं व व्यवसाय वेगळ्या उंचीवर न्यावा यासाठी मुलांनी काय करावे? – शितल विठ्ठल मोरे
● आपले विचार आणि मुलांना व्यवसायात प्रगती करण्यासाठी विचारलेले प्रश्न नक्कीच बाकी पालकांना प्रेरणा देतील. कारण सर्व जण उत्तम नोकरी कशी मिळेल याच अनुषंगाने विचार करताना व प्रश्न विचारताना दिसतात, पण तुमच्या मुलांबाबत व्यवसायाबद्दल प्लॅनिंग/ नियोजन नक्कीच कौतुकास्पद आहे
मुलीच्या इंजीनिअर होण्याच्या इच्छेवर बोलावे तर तिचे दहावीतील गुण आपण कळवलेले नाहीत, गणित आणि विज्ञान मधील गुण व आवड कळल्यास दिशा देता येते, तरी ८० ते ९० असतील तर जेईई सीईटीच्या नादी न लागता पॉलिटेक्निक करून पदवीकडे जावे, मुलाचे सुद्धा गुण कळले असते तर सल्ला नेमका देता येतो, कॉमर्स गणित सोबत घ्यावे की नाही हे दहावीतील गणितावर अवलंबून असते, त्यानुसार निर्णय घ्यावा, त्यानंतर बीकॉम करून एमबीए करावे. त्यावेळी मार्केटिंग, टेक्नॉलॉजी, अकाउंटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, एक्झिक्युशन, स्ट्रॅटेजी या बद्दलचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम असतात ते करावे. खूप आधी पासून हे करू नये. मुलीने इंजीनिअर झाल्यावर पुढील दिशा ठरवावी. खूप शुभेच्छा.
careerloksatta@gmail.com