Success Story Of Suresh Narayanan : कधी रात्री २ वाजता भूक लागते म्हणून तर कधी सकाळचा नाश्ता म्हणून दोन मिनिटांत झटपट होणारी मॅगी खायला सर्वांनाच आवडते. मॅगीनंतरही अनेक ब्रॅण्ड्स बाजारात आले, तरीही मॅगी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व ग्राहकांची नेहमीच पहिली पसंती ठरली. पण, मॅगीला विरोधही तितकाच झाला. नक्की कसा होता मॅगीचा प्रवास (Success Story), हे आपण आज या बातमीतून जाणून घेऊयात…

नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन ३१ जुलै २०२५ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची नेस्ले समूहाबरोबरच्या २६ वर्षांच्या उल्लेखनीय प्रवासाची (Success Story) समाप्ती होणार आहे. २०१५ मध्ये मोठ्या संकटाचा सामना करणाऱ्या मॅगी नूडल्स ब्रँडचे पुनरुज्जीवन करण्याच्या नेतृत्वासाठी सुरेश नारायणन प्रसिद्ध आहेत.

मॅगी नूडल्सवर बंदी :

नारायणन यांनी २०१५ मध्ये नेस्ले इंडियाचा पदभार स्वीकारला तेव्हा कंपनी एका गंभीर समस्येला सामोरे जात होती. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने देशभरात मॅगी नूडल्सवर बंदी घातली होती. नेस्लेच्या मॅगी नूडल्समध्ये धोकादायक रसायनांचा (शिसे) वापर केल्याच्या आरोपानंतर उत्पादनावर सहा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. कंपनीला बाजारातून ३८,००० टन नूडल्स परत मागवून घ्यावे लागले. कारण यामुळे लोकांच्या आरोग्यावर धोका होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

हेही वाचा…Success Story : जिद्दीची गोष्ट! पिझ्झानं बदललं आयुष्य अन् आज उभारली कोट्यवधींची कंपनी; वाचा संदीप यांची प्रेरणादायी कहाणी

नारायणन यांनी संकटाचे फक्त व्यवस्थापन करण्याऐवजी ब्रँडची प्रतिमा सुधारण्यासाठी एक कॅम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रॅटजी (comprehensive strategy) तयार केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे मॅगी फक्त पुन्हा उभी राहिली नाही, तर तिने झपाट्याने लोकप्रियता मिळवून पुन्हा एकदा तात्काळ नूडल्स बाजारात आघाडीवर स्थान मिळवले आणि मॅगी पुन्हा घराघरांत आवडती बनली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूर, इजिप्त आणि फिलीपिन्ससह अनेक देशांमध्ये त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावल्यामुळे नारायणन यांचे योगदान भारताच्या पलीकडेही आहे. ते नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीवमधील ऑपरेशन्स व्यवस्थापित करण्यासाठी देखील सक्षम आहेत. आर्थिकदृष्ट्या, नेस्ले इंडियाने नारायणन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची लक्षणीय वाढ पाहिली. कंपनीचा करानंतरचा नफा जवळपास सात पटींनी वाढला असून तो फायनान्शियल इयर २०२४ मध्ये ३,९३३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याचे बाजार भांडवलदेखील २०१५ मधील ५७,६१९ कोटी रुपयांवरून ऑक्टोबर २०२३ पर्यंत २,४७,९३३ कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव दर्शविते.