Indian Polity In Marathi : मागील लेखातून आपण भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांबाबत जाणून घेऊ या. भारतीय संविधानातील कलम ५१-क मध्ये मूलभूत कर्तव्ये दिली आहेत. ज्या वेळी मूळ राज्यघटना लागू करण्यात आली. त्याहवेळी राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यासाठी तत्कालीन कॉंग्रेस सरकारने १९७६ साली स्वर्ण सिंह समितीची स्थापना केली. या समितीच्या शिफारशींच्या आधारावर १९७६ साली करण्यात आलेल्या ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात १० मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. पुढे वर्ष २००० साली आणखी एका मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला.

महत्त्वाचे म्हणजे मूलभूत कर्तव्यांसंदर्भात स्वर्ण सिंह समितीने आठ शिफारशी दिल्या होत्या. मात्र, ज्या वेळी ४२वी घटनादुरुस्ती करण्यात आली, त्या वेळी संविधानात १० मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. तसेच काँग्रेस सरकारने स्वर्ण सिंह समितीच्या आठ शिफारशींपैकी तीन शिफारशी अमान्य केल्या.

Smita Sabharwal Pooja Khedkar
IAS Smita Sabharwal : पूजा खेडकर आणि UPSC दिव्यांगासाठी राखीव जागेवरून IAS अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट; तक्रार दाखल
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
article about 51c in the constitution of india
संविधानभान : आम्ही चालवू हा पुढे वारसा!
Maruti Fourth gen Swift
६.५ लाखाच्या ‘या’ कारनं Punch, Creta चं संपवलं वर्चस्व! खरेदीसाठी हजारो ग्राहकांच्या रांगा, मायलेज २५.७५ किमी
Constitutional Amendments
UPSC-MPSC : घटनादुरुस्ती म्हणजे काय? घटनादुरुस्तीच्या पद्धती कोणत्या?
Sengol in Lok Sabha controversies myths history and reality about Sengol
लोकसभेतील सेंगोलवरुन पुन्हा वाद होण्याची चिन्हे; काय आहेत सेंगोलबाबतची मिथकं, वाद, इतिहास आणि वास्तव
rahul gandhi as opposition leader
लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींकडे कोणते अधिकार असतील?
Budh Uday in Gemini
उद्यापासून ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस होणार सुरु? बुध उदय स्थितीत येताच दार ठोठावेल लक्ष्मी!

मूलभूत कर्तव्य पुढीलप्रमाणे-

  1. संविधान, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे.
  2. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शांची जोपासना करणे.
  3. पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि प्राणिमात्रांप्रति भूतदया दाखवणे.
  4. देशाचे संरक्षण करणे आणि आवाहन केले जाईल तेव्हा देशाची सेवा करण्यास तयार राहणे.
  5. भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता अबाधित राखणे.
  6. धर्म, भाषा, प्रांत यांच्या आधारावर भेदभाव न करता, एकोपा राखणे आणि महिलांचा अपमान करणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.
  7. देशाच्या संस्कृतीचे जतन करणे.
  8. सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण करणे.
  9. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि सुधारणावाद यांचा विकास करणे.
  10. राष्ट्राच्या विकासासाठी वैयक्तिक व सामुदायिक कार्यक्षेत्रात यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करणे.
  11. प्रत्येक माता-पित्याने सहा ते १४ वर्षे वयोगटातील मुलाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

स्वर्ण सिंह समितीच्या तीन अमान्य शिफारशी-

  1. मूलभूत कर्तव्यांचे पालन न केल्यास संबंधितांना दंड करण्याचा अधिकार संसदेकडे असेल.
  2. असा दंड किंवा शिक्षेची तरतूद करणाऱ्या कायद्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करता येणार नाही.
  3. कर भरणे हे देखील राष्ट्रीय कर्तव्य असावे.