यूपीएससीने २०१३ पासून नागरी सेवेच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि स्वरूप यांत महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे. आजच्या प्रस्तुत लेखामध्ये आपण मुख्य परीक्षेमधील ‘सामान्य अध्ययन पेपर ३’मधील अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेल्या घटकाची चर्चा करणार आहोत. या पेपरमध्ये तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रत्येक घटकामध्ये अंतर्भूत असणाऱ्या मुद्दय़ांची यादी देण्यात आलेली आहे. प्रस्तुत लेखामध्ये आपण या पेपरमध्ये नमूद केलेला अभ्यासक्रम तसेच या पेपरचे स्वरूप आणि व्याप्ती याचा आढावा थोडक्यात घेणार आहोत.
आर्थिक विकास या घटकामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधित मुद्दय़ांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये अर्थव्यवस्थेशी निगडित आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, नैसर्गिक साधनसंपत्ती व या संपत्तीच्या वापराचे नियोजन, सर्वसमावेशक वाढ आणि ही वाढ साध्य करण्यासाठी सरकारमार्फत राबवले जाणारे महत्त्वाचे उपक्रम, कृषी आणि कृषीसंबंधित क्षेत्र तसेच कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाटा वाढवण्यासाठी सरकारमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या व या समस्या सोडवण्यासाठी सरकारने आखलेली ध्येयधोरणे याचा समावेश आहे. तसेच औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र यांसारख्या आíथक विकासाला आणि आर्थिक वृद्धीला अधिक गती देणाऱ्या क्षेत्रासाठी सरकारमार्फत राबवले जाणारे विविध उपक्रम, योजना, आखण्यात आलेले कायदे, गुंतवणूक धोरण, भारतामध्ये परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी आखण्यात आलेली रणनीती व याचबरोबर भारताचे परकीय व्यापार धोरण व निर्यातवाढीसाठी आखलेल्या विविध उपाययोजना, दळणवळण क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सरकारमार्फत केले जाणारे विशेष प्रयत्न, १९९१ मध्ये भारताने अवलंबिलेले आíथक उदारीकरणाचे धोरण आणि याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम महत्त्वपूर्ण मुद्दय़ांचा अभ्यास या घटकाची तयारी करताना करावा लागणार आहे.
तंत्रज्ञान हा घटक मुखत्वे विज्ञान आणि तंत्रज्ञान या अनुषंगाने समाविष्ट आहे. या घटकामध्ये माहिती तंत्रज्ञान, संगणक, अवकाश संशोधन व विकास, नॅनो तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा अधिकारसबंधित मुद्दे इत्यादी बाबींचा समावेश आहे. केंद्र सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये विकास घडवून आणण्यासाठी कोणत्या प्रकारच्या धोरणांची आखणी केलेली आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास, व्यवहार व उपयोगिता, तसेच याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि दिलेले योगदान या बाबींचा विचार करावा लागतो. उपरोक्त घटकांविषयी दररोज काही ना काही महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे हा घटक अभ्यासताना उपरोक्त नमूद केलेल्या प्रत्येक बाबीच्या मूलभूत संकल्पनेसह योग्य समज असावी लागते. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये लावले जाणारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवनवीन शोध आणि या शोधामुळे होणारे लाभ आणि दुरुपयोग, सबंधित बौद्धिक संपदा अधिकार तसेच याचे होणारे परिणाम इत्यादी महत्त्वपूर्ण पलूंचा सविस्तर अभ्यास करावा.
जैवविविधता, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकामध्ये पर्यावरण संवर्धन, पर्यावरण आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास व या ऱ्हासासाठी जबाबदार असणारे घटक, जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, पर्यावरणीय प्रदूषण व यामुळे उत्पन्न झालेल्या समस्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, केंद्र सरकारमार्फत जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित करण्यासाठी पारित करण्यात आलेले विविध कायदे व त्यांची उपयुक्तता याचबरोबर पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागतात. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्तीचे प्रकार ज्यामध्ये नसíगक आणि मानवनिर्मित प्रकारांचा अंतर्भाव आहे, आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या तसेच आपत्ती निवारणासाठी सरकारमार्फत आखण्यात आलेली आपत्ती व्यवस्थापन योजना व कायदे इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागतात.
सद्य:स्थितीत भारताला बा आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे व या समस्या देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत आहेत. सुरक्षा या घटकामध्ये भारताच्या बा आणि अंतर्गत सुरक्षेसंबंधी मुद्दय़ांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये नक्षलवाद, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, दहशतवाद, वाढता प्रादेशिकवाद, पूर्वेकडील राज्यामध्ये होणारी घुसखोरी व वांशिक चळवळी, आंतरराष्ट्रीय सीमांसंबंधी असणारे वादविवाद, संघटित गुन्हेगारी, अवैध पसा हस्तांतरण, सीमेवर अवैधरीत्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी आणि याचे असणारे संघटित स्वरूप, सततचे होणारे भाषिक वाद, राज्य-राज्यांतर्गत असणारे वाद, धार्मिक दंगे, सायबर सुरक्षेसंबंधित मूलभूत माहिती, माध्यमे आणि सोशल नेटवìकग साइट्स यांचा होणारा वापर ज्याद्वारे देशातील सामाजिक सलोख्याला निर्माण होणारा धोका इत्यादी बाबी अंतर्भूत आहेत. त्याच्या जोडीला या आव्हानांना सामोरे जाताना केंद्र सरकारने आखलेली रणनीती ज्यामध्ये सीमा सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक सक्षमरीत्या राबवणे, सीमेलगतच्या भागाचा विकास घडवून आणणे, याचबरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा विचार करावा लागतो तसेच देशाची बा आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सरकारमार्फत स्थापन करण्यात आलेल्या विविध सरकारी संस्था आणि संघटना व त्यांना नेमून दिलेले कार्य, सरकारमार्फत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना व कायदे यांचा अभ्यास करावा लागणार आहे.
उपरोक्त चर्चिलेल्या जवळपास सर्व घटकांमध्ये महत्त्वाच्या संकल्पनांचाही समावेश असतो आणि या संकल्पनांचे योग्य आकलन होणे अपेक्षित आहे. आपण यापुढील प्रत्येक लेखामध्ये संबंधित घटकामधील काही महत्त्वाच्या संकल्पनांवरही चर्चा करणार आहोत. उपरोक्त सर्व घटक अभ्यासताना या घटकांसंबंधी घडणाऱ्या महत्त्वाच्या चालू घडामोडी याचीही तयारी करावी लागणार आहे. अर्थात प्रत्येक घटकाचे मूलभूत ज्ञान असल्याशिवाय चालू घडामोडीचे योग्य आकलन करता येत नाही. पुढील लेखामध्ये या पेपरमध्ये नमूद केलेल्या आíथक विकास या घटकाची तयारी करण्यासाठी लागणाऱ्या उपयुक्त संदर्भग्रंथांची तसेच गतवर्षीय मुख्य परीक्षेत या घटकावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते, याची एकत्रितपणे चर्चा करणार आहोत.
श्रीकांत जाधव
(लेखांक १)