पूर्वीच्या तुलनेत स्त्रियांचं शिक्षण वाढलं, नवऱ्याच्या बरोबरीनं स्त्रिया कमवू लागल्या. पण एकं दरीत स्त्रियांच्या आयुष्यात आणि त्यांच्या दिनक्रमात किती फरक पडला?  स्त्रियांच्या म्हणून ठरवून दिलेल्या जबाबदाऱ्या सुटल्या तर नाहीत, उलट वाढतच चालल्या आहेत.  हा वाढता शारीरिक आणि मानसिक ताण स्त्रियांच्या आरोग्याला दिवसेंदिवस घातक ठरतोय.. याबद्दल अनेकदा बोलूनही  झालंय आणि लिहूनही आलंय, तरीही तिच्या परिस्थितीत ना बदल घडतोय ना तिची दगदग थांबतेय. या मनोकायिक समस्यांनी तिची अवस्था दुभंग होत चाललेली आहे. हे चांगल्या समाजाचं लक्षण नाही.. सामाजिक भान असणाऱ्या आणि स्त्री आरोग्यासाठी काम करणाऱ्या डॉ. किशोर अतनूरकर यांचा गेल्या ३२ वर्षांतल्या अनुभवांवरचा हा लेख.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्त्री’पण निभावणं ही सहज सोपी गोष्ट नाही. मुलगी म्हणून जन्माला आल्यावर ‘स्त्री’पणाला सामोरं जाणं म्हणजे स्त्री म्हणून असणाऱ्या सहनशक्तीची परीक्षाच आहे. वयात येणं, लग्न, गर्भधारणा, अपत्यजन्म, संततीनियमन, रजोनिवृत्ती या नैसर्गिक चक्राबरोबरच गर्भपात, वजनवाढ, मूल न होणं, या गोष्टींमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आहेतच. आयुष्यातील ३०-४० वर्ष या चक्रात अडकूनही सुदृढ शरीराची आस बाळगत जगत राहाणं, हे स्त्रियांपुढचं आव्हान ठरतंय, कारण आता स्त्रियांच्या शारीरिक त्रासात भर पडली आहे ती मानसिक ताणाची. शारीरिक कष्ट आणि वाढत चाललेले मानसिक ताण यात आजची स्त्री मनोकायिकदृष्टय़ा दुभंगत चालली आहे.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on dr kishore atanurkar who is socially conscious and works for women health abn
First published on: 20-02-2021 at 00:36 IST