कोलकातामध्ये मंगळवारी सायंकाळी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारानंतर काही जणांकडून ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली. या कृत्याच्या निषेधार्थ आज (दि.१५) सीपीआय (एम) चे महासचिव सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वात कोलकात्यात मोर्चा काढून विरोध दर्शवण्यात आला.

यावेळी सीताराम येचुरी यांनी कोलकत्यात असे कसे काय घडू शकते? याचा शोध घेण्यासाठी या घटनेचा तपास झाला पाहिजे, असे म्हटले. तर तृणमुल काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीने देखील ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या मोडतोडीचा निषेध व्यक्त केला.

दुसरीकडे तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यासागर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केली आहे, असा आरोप भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी केलेला आहे.