Google ने दोन महिन्यात दीड लाखाहून अधिक मजकूर हटवला आहे. गुगलने शुक्रवारी जाहीर केलेल्या मासिक पारदर्शकतेच्या अहवालात म्हटले आहे की, वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याने मे महिन्यात ७१,१३२ आणि जूनमध्ये८३,६१३ मजकूर काढून टाकण्यात आली. वापरकर्त्यांच्या तक्रारींव्यतिरिक्त, Google ने स्वयंचलित प्रक्रियेद्वारे मे मध्ये ६,३४,३५७ आणि जूनमध्ये ५,२६,८६६ मजकूर काढून टाकला. यूएस-आधारित कंपनीने २६ मे रोजी लागू झालेल्या भारताच्या आयटी नियमांचे पालन करून ही माहिती दिली.

गुगलने आपल्या पहिल्या अहवालात म्हटले आहे की, यावर्षी एप्रिलमध्ये त्यांना भारतातील वैयक्तिक वापरकर्त्यांकडून स्थानिक कायदे किंवा वैयक्तिक हक्कांच्या उल्लंघनाबाबत २७,७०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, परिणामी ५९,३५० मजकूर काढून टाकण्यात आला.

नवज्योत सिंग सिद्धूंच्या नावे ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून काँग्रेस कार्यकर्त्याची आत्महत्या

तसेच गुगलने मे महिन्याच्या अहवालात सांगितले की, त्यांना वैयक्तिक वापरकर्त्यांकडून ३४,८८३ प्राप्त झाल्या अहेत आणि त्यावार आधारित ७१,१३२ मजकूराविरोधात कारवाई केली आहे.

या तक्रारी तृतीय-पक्षाच्या सामग्रीशी संबंधित आहेत. ज्यात Google च्या एसएसएमआय (उल्लेखनीय सोशल मीडिया इंटरमीडियरी) प्लॅटफॉर्मवरील स्थानिक कायद्यांचे किंवा वैयक्तिक हक्कांचे उल्लंघन केल्याचे समजल्या जाते.

ज्या तक्रारींवर कारवाई करण्यात आली करण्यात आली त्यापैकी बहुतेक कॉपीराइटशी संबंधित होत्या (७०,३६५). याव्यतिरिक्त, बदनामी (७५३), कॉपी (५), इतर कायदेशीर उल्लंघने (४), फसवणूक (३) आणि लैंगिक सामग्री (२) यासह अनेक प्रकारच्या तक्रारी हाताळल्या गेल्या.