मुंबईतील १९९३च्या बाँबस्फोट मालिकेतील आरोपी याकूब मेमन याच्या कुटुंबीयांना त्याला भेटीची परवानगी देऊन त्याच्या फाशीचे प्रकरण सरकारने दयाळूपणे हाताळले आणि यामुळेच फाशीनंतर शांतता कायम राहिली, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे.
लोकशाहीत जसे वागायला हवे, तसेच सरकार वागले. मेमनचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे कुटुंबीय नागपुरात हजर असतील हे सरकारने निश्चित केले, तसेच त्याच्या अंत्यसंस्कारात भाग घेण्याची परवानगी दिली. यातून भारतीयत्वाची मूल्ये व नीतिनियम दिसून आले, असे संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार म्हणाले. या फाशीमुळे काही तरी घटना घडेल असे वातावरण देशात होते. सरकारने न्यायालयीन निर्णयानंतरची परिस्थिती हाताळताना भारतीयत्वाचे मूळ तत्त्वाचे पालन केले आहे,असे इंद्रेश कुमार यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2015 रोजी प्रकाशित
‘याकूबप्रकरणी केंद्र सरकार दयाळूच’
मुंबईतील १९९३च्या बाँबस्फोट मालिकेतील आरोपी याकूब मेमन याच्या कुटुंबीयांना त्याला भेटीची परवानगी देऊन त्याच्या फाशीचे प्रकरण

First published on: 02-08-2015 at 04:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt shows mercy on yakub case