दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गाजियाबादला पावसाचा खूप मोठा फटका बसला असून वसुंधरा येथे रस्ता खचल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीये. नोएडा, गाजियाबाद आणि गुडगाव येथे रस्त्यांवर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. #DelhiRains cause waterlogging in #MayurVihar. #Delhi #delhiweather #Delhirain @dtptraffic pic.twitter.com/0KJcRqh4Qs — SkymetWeather (@SkymetWeather) July 26, 2018 #WATCH Newly constructed Raj Nagar Extension Elevated Road in Ghaziabad heavily waterlogged due to heavy rains in the region pic.twitter.com/Mzf50j5SM1 — ANI UP (@ANINewsUP) July 26, 2018 #WATCH Road caves in Vasundhara area of Ghaziabad following heavy rains in the area. pic.twitter.com/syZlNGszrM — ANI UP (@ANINewsUP) July 26, 2018 दरम्यान पावसाचा परिणाम विमान आणि रेल्वेसेवेवर झाला असल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. हवामान खात्याने दिल्ली-एनसीआरमध्ये तुफान पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. उत्तर भारतात पुढील पाच दिवस पाऊस पडत राहील असा अंदाज आहे. हवामानात कोणताही बदल होणार नसल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर पश्चिम भारतातही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे.