आपले सरकार सत्तेवर आल्यास कर्तव्य बजावताना शहीद होणाऱ्या निमलष्करी दलाच्या जवानांना शहिदांचा दर्जा देण्यात येईल, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे जाहीर केले.

जेएलएन स्टेडियम येथे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला त्या वेळी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये गांधी यांनी वरील बाब जाहीर केली. निमलष्करी दलाच्या जवानांना शहिदांचा दर्जा दिला जात नाही, मात्र त्यांना तो मिळावयास हवा, आमचे सरकार आल्यास तो दर्जा दिला जाईल, असे गांधी म्हणाले.