यूपीएच्या काळात निर्भया प्रकरण घडल्यावर त्यावेळी विरोधात असलेल्या स्मृती इराणी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या भेट म्हणून पाठवल्या होत्या. आता उन्नाव आणि कठुआतील बलात्कार प्रकरणानंतर केंद्रात मंत्री असलेल्या स्मृती इराणी पंतप्रधान मोदींना काय पाठवणार आहेत? असा प्रश्न पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी विचारला आहे. मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवण्याची हिंमत दाखवणाऱ्या स्मृती इराणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बांगड्या पाठवणार का? असेही त्यांनी विचारले आहे.
यूपी के उन्नाव और जम्मू-कश्मीर के कठुआ की बलात्कारी घटना के बाद भाजपा सरकार की महिला मंत्री स्मृति ईरानी क्यूँ चुप हैं???
दिल्ली की निर्भया को न्याय दिलाने के लिए उस वक़्त के प्रधानमंत्री मनमोहनसिंह जी को चूड़ियाँ भेजने वाली स्मृति दीदी आज के प्रधानमंत्री मोदी जी को क्या भेजेगी !— Hardik Patel (@HardikPatel_) April 13, 2018
सध्या देशात उन्नाव आणि कठुआ येथील सामूहिक बलात्कार प्रकरण चांगलेच गाजते आहे. याच प्रकरणात आता स्मृती इराणी यांना प्रश्न करत हार्दिक पटेल यांनी खोचक प्रश्न विचारला आहे. तसेच स्मृती इराणी उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणात गप्प का? एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या घोषणा देतात. दुसरीकडे भाजपाच्याच राज्यात महिला सुरक्षित नाहीत अशी परिस्थिती आहे. उन्नाव आणि कठुआ या ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटनांमुळे देशाची मान शरमेने खाली गेली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे असेही हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जहां ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ के अपने खोखले विजन पर जोर देते नहीं थकते वहीं उन्हीं की पार्टी के शासन वाले राज्यों में गैंगरेप की दो घटनाओं ने ना सिर्फ देशवासियों को शर्मसार किया है बल्कि महिला सुरक्षा के दावों की असलियत भी सामने ला दी है.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Hardik Patel (@HardikPatel_) April 13, 2018
विकासाच्या नावाखाली देशातले वातावरण भकास करण्यापलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केले? असा प्रश्नही हार्दिक पटेल यांनी विचारला होता.
चार साल में विकास नहीं कर पाए और जनता के विश्वास पर खरे नहीं उत्तरे इसलिए अब विकास नहीं करने देते जैसे वाहियत शब्द के नाम पर उपवास पर बेठे हैं।आपके सांसद ने अपने क्षेत्र में कितना विकास किया,यह ज़रूरी हैं। #उपवासकीराजनीति
— Hardik Patel (@HardikPatel_) April 12, 2018