काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेठीतील त्यांच्या पराभवाला स्थानिक नेत्यांना जबाबदार धरले आहे. जनतेपासून त्यांचा संपर्क तुटल्याचे राहुल यांनी येथील दौऱ्यात स्पष्ट केले. अमेठी हे माझे घर आणि कुटुंब आहे. त्यामुळे अमेठीवासीयांशी फारकत घेणार नाही, अशी ग्वाही राहुल यांनी दिल्याचे युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नदीम अश्रफ जायसी यांनी सांगितले. वायनाडचा खासदार असलो तरी अमेठीच्या विकासावर परिणाम होणार नाही, अशी ग्वाही राहुल यांनी दिली. अमेठीच्या समस्यांसाठी दिल्लीत संघर्ष करू, असे राहुल यांनी पक्षकार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.