भारतातील करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ५८ टक्के झाले आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. एवढंच नाही तर सध्याच्या घडीला साधारणतः देशभरातले तीन लाख रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर देशातील करोना रुग्णांचा मृत्यू दर हा ३ टक्के आहे, जे अत्यल्प आहे असंही हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. तसंच रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा १९ दिवसांवर पोहचला आहे. लॉकडाउनच्या आधी हे प्रमाण ३ दिवसांवर होते अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. Our recovery rate has gone above 58% and around 3 lakh people have recovered from #COVID19. Our mortality/fatality rate is near 3% which is very less. Our doubling rate has come down to near 19 days, which was 3 days before the lockdown: Union Health Minister Dr Harsh Vardhan pic.twitter.com/URziBpE3Zo — ANI (@ANI) June 27, 2020 भारतात सध्याच्या घडीला ५ लाख ८ हजार ९५३ करोना रुग्ण आहेत. यापैकी २ लाख ९५ हजार ८८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १ लाख ९७ हजार ३८७ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन देशभरात १५ हजार ६०० वर मृत्यू झाले आहेत. आणखी वाचा- Coronavirus : जनतेच्या लढ्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात चांगली स्थिती – पंतप्रधान देशात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वेगाने वाढते आहे. ही बाब भारतासाठी चांगलीच आहे. मागील २४ तासांमध्ये करोनाचे १० हजार २४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ३ लाखांच्या आसपास रुग्ण देशभरात बरे झाले आहेत अशीही माहितीही हर्षवर्धन यांनी दिली.