देशात वाढती धार्मिक, जातीय तेढ लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात एकतेचा मंत्र घेऊन पुढे जाण्याचा दिलेला संदेश तितकासा प्रभावी आणि स्पष्ट नसल्याची टीका आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी सोमवारी येथे केली.
जातीय आणि धार्मिक असहिष्णुतेच्या वातावरणात रेडिओवरील पंतप्रधानांचा शांततेचा संदेश फिका पडला, अशी प्रतिक्रिया गोगोई यांनी दिली. ते म्हणाले, देशात दादरी आणि फरिदाबादसारख्या घटना घडत असताना पंतप्रधानांनी त्यावरील तात्काळ प्रतिक्रिया देणे गरजेचे होते.