१९८४ च्या शिखविरोधी दंगलीत अनेक काँग्रेसजनांचा सहभाग असल्याची कबूली राहुल गांधी यांनी दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद शीख समाजात उमटू लागले आहेत. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबिर सिंग बादल यांनी कॉंग्रेसवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन  शीख समाजाला केले आहे.
काँग्रेस सरकारला जर दंगलीत सहभागी असणाऱ्या काँग्रेससजनांची नावे माहित असतील तर त्यांना तुरुंगात का टाकले नाही, असा सवाल करीत १९८४ च्या दंगलीबाबत राहुल यांनी क्षमा मागितली नाही आणि हे निंदनिय असल्याचेही बादल यांनी येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले.याप्रकरणी न्यायालयाने स्वतहून दखल घेत राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाई करावी,अशी मागणी बादल यांनी  केली आहे.