दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या ४९ दिवसांच्या सरकारमधील वादग्रस्त मंत्री सोमनाथ भारती यांना नव्या मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मतदारसंघातील विकासकामांकडे जास्त लक्ष देऊन एक ‘मॉडेल’ मतदारसंघ बांधण्यासाठी स्वत:च मंत्रिपदाची जबाबदारी न घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी सारवासारव भारती यांनी केली आहे.