भारताच्या ग्रामीण भागातील सुमारे १० कोटी घरांमध्ये स्वच्छतागृहे नसून या पाश्र्वभूमीवर उघडय़ावर नैसर्गिक विधी करण्याच्या क्रियेस आळा घालण्यासाठी सरकारला एक कोटी ५० हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
देशाच्या ग्रामीण भागातील ४० टक्के घरांमध्ये सध्या स्वच्छतागृहे असून उघडय़ावर नैसर्गिक विधी करण्याच्या प्रथेला २०२२ पर्यंत अटकाव करण्याची योजना आहे, असे स्वच्छता आणि पेयपाणी विभागाचे संचालक सुजोय मजुमदार यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील १८ कोटी लोकांपैकी १० कोटी लोकांच्या घरात सध्या स्वच्छतागृहे नाहीत. यासाठी दीड लाख कोटी रुपयांची आवश्यकता भासेल, याकडे मजुमदार यांनी लक्ष वेधले.
विद्यमान पंचवार्षिक योजनेंतर्गत केंद्र सरकारने या कामासाठी ३८ हजार कोटी रुपयांचे वाटप केले असून राज्य सरकारांना १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार असल्याची माहिती मजुमदार यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2014 रोजी प्रकाशित
ग्रामीण भारतातील सुमारे १० कोटी घरांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव
भारताच्या ग्रामीण भागातील सुमारे १० कोटी घरांमध्ये स्वच्छतागृहे नसून या पाश्र्वभूमीवर उघडय़ावर नैसर्गिक विधी करण्याच्या क्रियेस आळा घालण्यासाठी सरकारला एक कोटी ५० हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
First published on: 25-06-2014 at 12:36 IST
TOPICSसॅनिटायझेशन
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 crore households in rural part of india have no toilets