नोकरीच्या आमिषाने रशियात गेलेले काही भारतीय तरुण रशिया-युक्रेन संघर्षात अडकले आहेत. या तरुणांची सुटका करण्यासाठी भारत सरकारकडून पुरेपूर प्रयत्न केला जातोय. भारतीय परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार अशा २० तरुणांची रशियन सैनिकांच्या ताब्यातून सुटका व्हावी यासाठी हे प्रयत्न केले जातायत. रशियात असेलेल्या भारतीयांनी युद्धात सहभाही होऊ नये. तसेच युद्धाच्या क्षेत्रात जाऊन कठीण परिस्थितीत अडकू नये, असे आवाहन भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी केले आहे.

“भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू आहेत”

“आम्ही रशियन प्रशासनाच्या संपर्कात आहोत. दिल्ली तसेच मॉस्कोतून आमचे या भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू आहेत,” असेही जैस्वाल यांनी सांगितले. सोमवारी परराष्ट्र खात्याने याआधीच रशियाने काही भारतीयांची सुटका केली आहे, असे सांगितले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 indians stuck in russia ministry of external affairs trying to discharge of them in touch with moscow prd
First published on: 29-02-2024 at 19:44 IST