उत्तर प्रदेशमधील कासगंज जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. येथे प्रवाशांना घेऊन जाणारे एक ट्रॅक्टर ट्रॉलीसहित थेट तलावात पडल्यामुळे तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला तसेच लहान मुलांचाही समावेश आहे. रविवारी (२४ फेब्रुवारी) हा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रॅक्टर ट्रॉलीत एकूण ४० जण बसलेले होते. यातील अनेकजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

प्रवास गंगेत स्नान करण्यासाठी निघाले होते

पोलिसांनी सांगितल्यानुसार कासगंज जिल्ह्यातील गधाई गावाजवळ रियाजगंज-पटियाली रस्त्यावर हा अपघात घडला. ट्रॅक्टरमधून प्रवास करणारे प्रवासी हे मूळचे एटा जिल्ह्यातील जैथारा गावातील होते. हे प्रवासी गंगेत स्नान करण्यासाठी ते कादरगंजकडे जात होते.

heavy rain, thane district, Barvi Dam, storage, 60 percentage
बारवी धरण ६० टक्के भरले, २४ तासांत ६ टक्क्यांची वाढ
Union Budget 2024 Live Updates in Marathi
budget 2024 : आरोग्य तरतुदीत १२.९६ टक्क्यांची वाढ ; कर्करोगावरील तीन औषधे स्वस्त होणार
pregnant woman, jcb, Gadchiroli,
VIDEO : जेसीबीत बसून गर्भवतीने ओलांडला नाला, निकृष्ट रस्त्यांमुळे दुर्गम भामरागड तालुक्यातील नागरिकांचा जीव धोक्यात
Gulanchwadi, truck, funeral crowd,
पुणे : अंत्यविधीतील गर्दीत भरधाव ट्रक घुसला; चिरडून तीन जणांचा मृत्यू
severe shortage of water in cidco colony
सिडको वसाहतींमध्ये पाणीटंचाई; २० टक्के पाणीकपातीमुळे नागरिक हवालदिल, उरणवासीयांना मात्र कपातीपासून दिलासा
dams that supply water to mumbai have more storage than last year
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १५ जुलैपर्यंत ३५ टक्के साठा, गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक पाणीसाठा
local, accidents, injured,
लोकल अपघातात रोज सरासरी सात प्रवाशांचा मृत्यू, जखमींच्या संख्येत १५ टक्क्यांनी वाढ
Seven cow and Buffaloes died due to lightning in Pisvali near Dombivli
डोंबिवलीजवळील पिसवलीत विजेच्या धक्क्याने सात जनावरांचा मृत्यू

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टरचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचा ट्रॅक्टरवरील तोल सुटला. ज्यामुळे अपघात झाला. “तलावात पडलेल्या प्रवाशांना बुलडोझरच्या मदतीने बाहेर काढले जात आहे. तर जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातादरम्यान ट्रॅक्टर अन्य वाहनांवरही आदळले. त्यामुळे इतर वाहनांचाही यावेळी अपघात झाला. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे,” असे किसनगंज पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची आर्थिक मदत

दरम्यान, या घटनेची दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.