पीटीआय, नवी दिल्ली

पंजाब आणि हरियाणामध्ये शेतांमध्ये पिकांची कापणी झाल्यानंतर उरलेले खुंट जाळण्याची पद्धत ही गंभीर समस्या असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार करा असे निर्देश ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने (एनजीटी) अलिकडेच दोन्ही राज्यांना दिले. हा आराखडा पुढील वर्षांसाठी १ जानेवारी ते १ सप्टेंबर या कालावधीमध्ये पिकांचे खुंट जाळण्यासंबंधी ठराविक मुदतीसाठी असेल. यावर उपचारात्मक कृती आतापासूनच सुरू केली पाहिजे.

Mumbai, Sanjay Gandhi National Park, slum rehabilitation, High Court order, illegal encroachments, forest management, state government,
राष्ट्रीय उद्यान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश, बेकायदा झोपडीधारकांच्या तातडीच्या पुनर्वसनासाठी धोरण आखण्याबाबत सूचना
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश
Online facility available for transfer in slum redevelopment Mumbai
झोपु घरांचे स्थलांतर आता सोपे! ॲानलाईन सुविधा उपलब्ध
India allows drugs for weight loss Alzheimer’s and cancer approved globally
विश्लेषण : अल्झायमर्स, वजनघट, कर्करोगावरील औषधे भारतात येण्याचा मार्ग सुरळीत… काय आहे नियमातील नवा बदल?
vijay wadettiwar criticized raj thackeray
Vijay Wadettiwar : “राज ठाकरे हे गोंधळलेले नेते, ते सध्या…”; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यावरून विजय वडेट्टीवारांची टीका!
mining construction work health risk
सिलिकोसिस म्हणजे काय? बांधकाम मजूर अन् खाणकामगारांमध्ये फुफ्फुसाच्या या जीवघेण्या आजाराचा धोका वाढण्याचे कारण काय?
Nashik, onion cargo, border reopening, Bangladesh violence, export hurdles,
महाराष्ट्रातील कांद्याला बांग्लादेशची सीमा ३२ तासानंतर खुली, निर्यातदारांना बँकांचे व्यवहार सुरळीत होण्याची प्रतिक्षा

पंजाबमधील शेतांमध्ये खुंट जाळण्याच्या प्रकारांमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ होत असल्याच्या वृत्तपत्रातील बातमीची दखल घेऊन ‘एनजीटी’ने या प्रकरणाची सुनावणी घेतली. लवादाचे अध्यक्ष न्या. प्रकाश श्रीवास्तव म्हणाले, की हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या (सीएक्यूएम) अहवालानुसार या वर्षी पंजाबमध्ये शेतामध्ये खुंट जाळण्याच्या ३६ हजार ६३२ घटना घडल्या. त्यापैकी दोन हजार २८५ प्रकार १५ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत घडले. न्या. अरुण कुमार त्यागी आणि तज्ज्ञ ए सेंथिल वेल हे ‘एनजीटी’चे अन्य दोन सदस्य आहेत.

हेही वाचा >>>भारतीय विद्यार्थ्याला अमेरिकेत सात महिने डांबून ठेवलं, मार-मार मारलं अन्…, पोलिसांनी दिली अमानवीय कृत्यांची माहिती

जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, १५ सप्टेंबर ते १६ नोव्हेंबरदरम्यान पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे पाच हजार ३५२ प्रसंग घडले तर हरियाणाच्या फरिदाबादमध्ये ४७६ आगी लावण्यात आल्या. खुंट जाळल्यामुळे गंभीर समस्या उद्भवतात हे लक्षात घेऊन आतापासूनच उपाययोजना केली पाहिजे असे ‘एनजीटी’ने सांगितले.

पंजाब आणि हरियाणासह, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात शेतांमध्ये खुंट जाळले जातात. त्यामुळे राजधानी दिल्ली शहरामधील प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढते. एका अभ्यासानुसार, ही पद्धत दिल्लीच्या प्रदूषणात ३० टक्क्यापेक्षा जास्त भर घालते. गेल्या महिन्यामध्ये दिल्लीच्या हवेची गुणवत्ता घातक ते अतिघातक अशी राहिली आहे.