‘काँग्रेसमुक्त भारत’ या घोषणेचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे स्पष्टीकरण गुरूवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून देण्यात आले. ते गुरूवारी मोदी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी अमित शहा यांनी म्हटले की, काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा काँग्रेसच्या अनेक दशकांच्या सत्ताकाळात तयार झालेल्या अव्यवस्थेविरुद्धची प्रतिक्रिया आहे. पक्षाच्या स्वार्थासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी देशाच्या भल्याकडे दुर्लक्ष केले. आम्हाला काँग्रेसच्या राजवटीखाली वाढलेल्या या व्यवस्थेचा अंत करायचा असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी शहा यांना खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची भूमिका पक्षाचे अधिकृत समजायची का, असा सवाल विचारला. यावर मी सांगेन तीच पक्षाची अधिकृत भूमिका असेल, असे शहा यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah nuances congress mukt bharat expression against avyavastha
First published on: 26-05-2016 at 14:55 IST