लोकसभा निवडणुकांचं घोडामैदान जवळ आलं आहे. निवडणुका कधी होणार याची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशात AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी थेट राहुल गांधींना खुलं आव्हान दिलं आहे. लोकसभा निवडणूक लढण्याविषयी हे आव्हान देण्यात आलं आहे. ओवैसींच्या या वक्तव्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

काय म्हटलं आहे ओवैसी यांनी?

“मी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आव्हान देतो. वायनाड नाही हैदराबादमधून निवडणूक लढून दाखवा. मोठमोठ्या घोषणा देता, आरोप करता, मग आता माझं आव्हान आहे. मैदानात या आणि माझ्या विरोधात लढून दाखवला. काँग्रेसचे लोक काहीही म्हणू देत. मी तयार आहे.” असं म्हणत राहुल गांधी यांना ओवैसी यांनी आव्हानच दिलं आहे. हैदराबाद या ठिकाणी ओवैसींची सभा पार पडली. त्या सभेत ओवैसी यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच उत्तर प्रदेशात जो वादग्रस्त ढाँचा होता तो सगळ्यात जुन्या पक्षाच्या सत्तेच्या काळात उद्ध्वस्त करण्यात आला असाही आरोप ओवैसींनी केला.

Loksatta editorial Finance Minister Nirmala Sitharaman in the budget on the states of Andhra Pradesh and Bihar
अग्रलेख: विश्वासामागील वास्तव!
CCTV surveillance, civil liberties, crime prevention, privacy, public interest, private surveillance, legal regulation, human intervention, misuse of CCTV, responsible regulation, civil liberties, CCTV surveillance, security, privacy, crime prevention, National Crime Records Bureau, Delhi, Hyderabad, Indore, Chennai,
सीसीटीव्हीच्या नजरकैदेत नागरी स्वातंत्र्य
Loksatta kutuhal Is artificial intelligence always accurate Can she never go wrong The answer is
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता चुकते तेव्हा..
trade and technology farmers marathi news
शेतकऱ्यांना कुबड्या नको, स्वातंत्र्य द्या!
rahul gandhi
“राजकारणात जय, पराजय होत असतो, पण…”; स्मृती इराणींना ट्रोल करणाऱ्यांसाठी राहुल गांधींची पोस्ट!
loksatta lokrang jagbharatle Dhatingan book Authoritarian democracy
निरंकुश सत्ताधाऱ्यांचा धांडोळा
What Narendra Modi Said About Congress And Rahul Gandhi?
पंतप्रधान मोदींनी घेतली राहुल गांधींची फिरकी, “बालबुद्धी असलेल्या..”, ‘शोले’तला ‘तो’ डायलॉगही म्हटला
ramdas athawale rahul gandhi
“राहुल गांधी व काँग्रेस पक्ष दहशतवादी”, रामदास आठवलेंचा आरोप; म्हणाले, “जनतेला ब्लॅकमेल करून त्यांनी…”

तेलंगणमध्ये विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी पार पडणार आहेत. तसंच लोकसभा निवडणूकही पुढच्याच वर्षी पार पडणार आहे. अशात एमआयएम आणि काँग्रेस आमनसामने आले आहेत. राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष असो की ओवैसींचा AIMIM पक्ष दोन्ही पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपा आणि एआयएमआयएम हे दोन पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत असा आरोप राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत केला होता. त्यानंतर आता ओवैसींनी राहुल गांधींना ओपन चॅलेंज दिलं आहे.