Asaduddin Owaisi on Foreign Secretary Vikram misri got trolled : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष संपुष्टात आल्याची घोषणा केल्यानंतर काही जणांनी सोशल मीडियावर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यावर टीका केल्याचा प्रकार समोर आला. सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असल्याने मिस्री यांनी त्यांचे एक्स अकाऊंट प्रायव्हेट केल्याचे पाहायला मिळाले. काही जणांनी तर मिस्री यांचे जुने फोटो आणि कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह भाषेत टीका केली. या ट्रोलिंगदरम्यान ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे विक्रम मिस्री यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत . तसेच त्यांनी सोशल मीडियावर मिस्री यांना ट्रोल करणार्यांना चांगलेच सुनावले आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना कष्टाळू आणि प्रामाणिक डिप्लोमॅट म्हटले आहे. ओवेसी यांनी लिहीलं की, “विक्रम मिस्री एक सभ्य, प्रामाणिक आणि मेहनती डिप्लोमॅट आहेत, जे आपल्या देशासाठी अथक मेहनत घेत आहेत. आपले नागरी सेवा अधिकारी हे एक्झिक्युटीव्हच्या अंतर्गत काम करतात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि एक्झिक्युटीव्ह किंवा देश चालवणाऱ्या कोणत्याही राजकीय नेतृत्वाकडून घेतल्या गेलेल्या निर्णयासाठी त्यांना दोषी ठरवले जाऊ नये.”
Mr Vikram Misri is a decent and an Honest Hard working Diplomat working tirelessly for our Nation.
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 11, 2025
Our Civil Servants work under the Executive this must be remembered & they shouldn’t be blamed for the decisions taken by The Executive /or any Political leadership running Watan E… https://t.co/yfM3ygfiyt
काँग्रेस नेत्याचाही ट्रोलर्सना तोंड बंद ठेवण्याचा सल्ला
ओवेसी यांच्याबरोबरच काँग्रेसचे नेते सलमान अनीस सोज यांनी देखील परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची बाजू घेत ट्रोल करणाऱ्यांना फटकारले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, “विक्रम मिस्री हे एक काश्मीरी आहेत आणि त्यांनी भारताचा गौरव वाढवला आहे. कोणत्याही प्रकारचे ट्रोलींग त्यांची देशाप्रती केलेली सेवा कमी करू शकत नाही. जर आभार मानू शकत नसाल तर तुमचं तोंड बंद ठेवा.”
Vikram Misri, a Kashmiri, has done India proud. No amount of trolling can diminish his service to the country. If you can't say thank you, learn to shut up.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Salman Anees Soz (@SalmanSoz) May 11, 2025
ट्रोल का केलं जातंय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह हे तीन जण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर चर्चेत आले आहेत. हे तीन जण भारताने केलेल्या कारवाईची माहिती माध्यमांसमोर येऊन देत होते. पण भारत आणि पाकिस्तान यांच्या शस्त्रविराम झाल्याचे काही लोकांना आवडले नाही, यावर नाराज झालेल्या लोकांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात सुरूवात केली.