गोलपारा जिल्ह्यातील गेंदामारी गावामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सहा नागरिकांरांचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सणानिमित्त रविवारी गावामध्ये काही नागरिक एकत्र बसले होते. त्यावेळी रात्री ९च्या सुमारास आठ बंदुकधारी दहशतवाद्यांनी नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या हल्ल्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयित गारो नॅशनल लिबरेशन आर्मीच्या (जीएनएलए) दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आसाम-मेघालयाच्या सीमेवर हे गाव आहे. निवडणुकीमुळे गेल्या महिनाभरापासून येथे तणावाचे वातावरण आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2013 रोजी प्रकाशित
आसाममध्ये दहशतवादी हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू
गोलपारा जिल्ह्यातील गेंदामारी गावामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सहा नागरिकांरांचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत.
First published on: 04-11-2013 at 11:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assam 6 killed as suspected garo militants attack group of people on diwali