उत्तराखंड सरकारने पतंजली समूहातील दिव्या फार्मसीच्या पाच औषध उत्पादनावर बंदी घातली आहे. मात्र, दिव्या फार्मसीकडून या वृत्ताचं खंडण करण्यात आलं आहे. तसेच, या वृत्ताचं ‘आयुर्वेद विरोधी ड्रग माफिया’ असा उल्लेख पतंजलीकडून करण्यात आला आहे.

उत्तराखंड सरकारने काही खोट्या माहिती आधारे दिव्या फार्मसीच्या पाच औषधांवर बंदी घातल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, पतंजलीकडून सांगण्यात आलं की, वृत्तपत्रांच्या बातम्यांचा हवाला देऊन उत्पादनांवर बंदी घातलेल्या आदेशाची प्रत अद्याप कंपनीला मिळालेली नाही. पण, यामागे ‘आयुर्वेद विरोधी औषध माफियांचा’ सहभाग असल्याचा संशय पतंजलीकडून व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा : कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचा मोठा इशारा, म्हणाले “कंपनी दिवाळखोरीत…”

सरकारी विभागाने आपली चूक सुधारत दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा पतंजलीच्या झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी. नुकसान भरपाई नाही दिल्यास, कायदेशीर कारवाईला तयार रहावे, असा इशाराही पतंजलीने दिला आहे.

हेही वाचा : राहुल गांधींच्या सभेला जाणाऱ्या यात्रेकरूंसोबत रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तराखंड औषध परवाना अधिकारी डॉ. जीसीएस जंगपांगी यांनी रक्तदाब, मधुमेह, गलगंड, काचबिंदू आणि उच्च कोलेस्ट्रॉलच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे उत्पादन थांबवण्यास पतंजलीला सांगितलं होते. तसेच, पतंजलीवर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती पसरवल्याचा आरोपही करण्यात आला होता. ‘एनडीटीव्ही’ने याबाबत वृत्त दिलं आहे.