नवी दिल्ली: काँग्रेसने थेट लढतीत भाजपला पराभूत केले आहे. हिमालच प्रदेश, राजस्थानमधील विजयाचा काँग्रेसला पंजाबमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला. हिमाचल प्रदेशमधील चार, राजस्थानातील दोन, महाराष्ट्रातील एक, कर्नाटकातील दोनपैकी एक अशा पोटनिवडणुकीतील आठ जागांवर काँग्रेसने थेट आव्हान देत भाजपचा पराभव केला आहे. पंतप्रधान मोदींनी आता तरी हटवादीपणा सोडावा, तीन शेती कायदे मागे घ्यावेत आणि पेट्रोल-डिझेल-गॅसची दरवाढ करून लोकांना लुबाडणे थांबवावे. लोकांना होणारा हा त्रास भाजपसाठी धोकादायक ठरेल, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. राजस्थानमध्ये पक्षांतर्गत संघर्ष मोडून काढून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या विजय मिळवून दिला आहे.