कर्नाटक चामराजनगरचे भाजपा खासदार व्ही श्रीनिवास प्रसाद यांचं रविवारी मध्यरात्री बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वा घेतला. गेल्या चार दिवसांपासून ते आयसीयूमध्ये दाखल होते.

माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार व्ही श्रीनिवास प्रसाद अनेक आजारांनी ग्रस्त होते. २२ एप्रिल रोजी त्यांना बंगळुरूतील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालं. अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव मैसुरू येथील जयलक्ष्मीपुरम आवास येथे आणलं जाईल.

narendra modi help soniya gandhi
“अन् मी लगेच सोनिया गांधी अन् अहमद पटेलांना फोन करून…”; पंतप्रधान मोदींनी सांगितला गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा ‘तो’ प्रसंग!
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
asaduddin owaisi
VIDEO : “देशात सर्वाधिक कंडोम मुस्लीम लोक वापरतात, तरीही…”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ विधानावर ओवैसींचे उत्तर
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

कोण आहेत व्ही. श्रीनिवास प्रसाद?

व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनी १९७६ मध्ये जनता पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. पुढे १९७९ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इतकेच नाही तर ते काही काळ जेडीएस, जेडीयू आणि समता पक्षाचे सदस्यही होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेशही केला. श्रीनिवास यांनी केंद्र सरकारपासून राज्यापर्यंत अनेक महत्त्वाची पदे दीर्घकाळ भूषवली.

१९९९ ते २००४ दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवले. नंतर, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते २०१३ मध्ये आमदार झाले आणि सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री झाले. २०१६ मध्ये त्यांनी कर्नाटक विधानसभेचा राजीनामा दिला आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. २०१७ च्या पोटनिवडणुकीत, त्यांनी भाजपच्या तिकिटावर नंजनगुडमधून निवडणूक लढवली होती, परंतु नंतर २०१९ मध्ये पक्षाने श्रीनिवास यांना चामराजनगरमधून लोकसभा निवडणूक लढवायला लावली, जिथून ते विजयी झाले. परंतु, त्यांनी नुकतीच राजकारणात संन्यास घेत असल्याची घोषणाही केली होती.