BJP on Arrest of Instagram influencer Sharmishtha Panoli : २२ वर्षीय इंस्टाग्राम एन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पानोली हिला झालेलेल्या अटकेप्रकरणी भाजपाच्या नेत्या अग्निमित्रा पौल यांनी सोमवारी पश्चिम बंगाल सरकारवर सडकून टीका केली आहे. पश्चिम बंगालमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्याचे आणि दोन समाजांना वेगवेगळी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी पनोलीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, यानंतर पौल यांनी ही टीका केली आहे. या एकूण प्रकरणाबद्दल बोलताना पौल म्हणाल्या की, “कंगना रनौत यांनी योग्य विधान केले आहे की पश्चिम बंगालला दुसरे नॉर्थ कोरिया करू नका, करण तेथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. पश्चिम बंगालमध्येही संविधानिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आणि तेथे हिंदू आणि मुस्लिमांसाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत.”
तसेच त्यांनी बार कौन्सिल आणि कंगना रनौत यांचे पानोलीला पाठिंबा दिल्याबद्दल आभार देखील मानले. “मी बार कौन्सिल आणि कंगना रनौत यांचे आभार (पानोलीच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल) मानते. प्रत्येक भारतीय, हिंदू आणि राष्ट्रवादी मुस्लिम यांनी अन्यायाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे,” असेही त्या म्हणाल्या.
पौल यांनी राज्य सरकारवर निवडक लोकांवर कारवाई आणि पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला आहे, त्या म्हणाल्या का, “ऑपरेशन सिंदूरनतंर पश्चिम बंगालमधून भारत, पीएम मोदी, देवी मा कामाख्या यांच्याबद्दल अपशब्द वापरलेल्या कितीतरी पोस्ट आपण पाहिल्या, पण कोणताही कारवाई करण्यात आली नाही…हा ममता सरकारकडून दिलेला स्पष्ट संदेश आहे की जर तुम्ही हिंदू किंवा एक मुस्लिम असाल, जो शिवीगाळ किंवा इतर काहीतरी मुस्लिमांविरोधात बोलत असेल तर तुम्हाला सोडले जाणारे नाही, पण हेच जर उलट असेल तर कोणतीही कारवाई केली जाणार नाही…”
त्यांनी पश्चिम बंगालमधील हिंदू समुदायाला याविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले, “पश्चिम बंगालमधील हिंदूंनी देखील उभे ठाकण्याची गरज आहे. ते सेक्युलरिझमच्या ढगाखाली झोपले आहेत. आपल्याला एका न्यूट्रल सरकारची आवश्यकता आहे… राज्यातील पोलीस आज फक्त एक धर्म पाहतात,” असे त्या म्हणाल्या.
भाजपा नेत्या पौल यांनी दावा केला की, “पोलीस अधिकार्याला शिवीगाळ करणाऱ्या अनुपमा मोंडल यांच्याविरोधात कोणताही कारवाई करण्यात आली नाही… ममता सरकार फक्त मुस्लिमांसाठी काम करते, हिंदूंसाठी नाही.”
पानोलीच्या अटकेबद्दल बोलताना पौल म्हणाल्या की, “शर्मिष्ठा पानोलीने वारंवार माफी मागितली, तिने पोस्ट देखील हटवली आणि असे असून देखील ममता बॅनर्जींचे पोलीस पुढाकार घेत गुरुग्राम येते गेले आणि तिला अटक केली.”
त्यांनी पुढे बोलताना अशाच प्रकारच्या घटनांकडे ममता बॅनर्जी सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा मु्द्दा उपस्थित केला, त्या म्हणाल्या की, “महुआ मोइत्रा या वारंवार आमच्या देवीसाठी अपशब्द वापरतात… पण कोणतीही कारवाई केली नाही… न्यायालयाने म्हटले आहे की मुर्शिदाबाद दंगली या टीएमसी नेत्यांनी घडवून आणल्याचे म्हटले आहे… कोणतीही कारवाई केली नाही… ममता बॅनर्जी हिंदूंना कोणतेही महत्त्व देत नाहीत.”
नेमकं प्रकरण काय आहे?
दरम्यान पीटीआयने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पानोलीने बॉलिवूड अभिनेत्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल बाळगलेल्या मौनाबद्दल टीका करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आणि त्यावर टीका होऊ लागली. त्यानंतर तिने हा व्हिडीओ डिलिट केला आणि जाहीरपणे माफी देखील मागितली. मात्र असे असताना तिला या प्रकरणी अनेक समन्स पाठवण्यात आले ज्याकडे तिने दुर्लक्ष केले अखेर शुक्रवारी रात्री गुरुग्राम येथून तिला अटक करण्यात आली.