नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या पसमांदा मुस्लिमांना आकर्षित करण्याच्या धोरणाला यश येऊ लागले आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीमध्ये पसमांदा मुस्लिमबहुल भागातील बरेलीच्या शाही नगर पंचायतीमध्ये भाजपचा ओबीसी हिंदू उमेदवार पहिल्यांदाच अध्यक्ष झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये ‘पिछडा पिछडा एक समान, हिंदू हो या मुसलमान’ असा नारा देऊन पसमांदा मुस्लिमांना विकासाचे आश्वासन योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने दिले होते. बरेली जिल्ह्यातील शाहीनगर पंचायत हा मुस्लिमबहुल इलाखा असून तिथे पसमांदा मुस्लिमांनी मते दिल्यामुळे वीरपाल मौर्य हे भाजपचे हिंदू ओबीसी उमेदवार पंचायत अध्यक्ष झाले आहेत. इथे सलग सहा वेळा मुस्लिमांमधील उच्चवर्णीय पठाण कुटुंबातील सदस्य पंचायत अध्यक्ष बनले होते. इथे ८० टक्के मुस्लीम मतदार असून त्यापैकी ६०-६५ टक्के मतदार पसमांदा मुस्लीम आहेत.  

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp president experiment on muslim votes in nagar panchayats uttar pradesh ysh
First published on: 23-05-2023 at 00:02 IST