नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सीबीआयने अवैध खाणप्रकरणी समन्स बजावले आहेत. अखिलेश यांना गुरुवारी, २९ फेब्रुवारीला दिल्लीत चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी हे समन्स आहेत. या प्रकरणात अखिलेश यांना साक्षीदार म्हणून उपस्थित राहावे लागणार आहे.

हेही वाचा >>> गुजरातमध्ये ३,३०० कोटींच्या अमली पदार्थाचा साठा जप्त; पाच विदेशी नागरिकांना अटक

from former Chief Minister Prithviraj Chavan Question over responsible for the extortion cases in the state
राज्यातील खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे तर कोण जबाबदार ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान
Image of FASTag logo
राज्यातील सर्व वाहनांना एक एप्रिलपासून FasTag बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय
bjp strategy to capture konkan through allocation of ministerial posts
मंत्रीपदांच्या वाटणीतून कोकणावर कब्जा मिळवण्याचे भाजपाचे डावपेच
Kapil Patil, Vaman Mhatre , Forecast , Ganesh Naik,
कपिल पाटील पुन्हा मंत्री, वामन म्हात्रे महापौर होतील, वन मंत्री गणेश नाईक यांचे भाकीत, नाईकांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
PM Modi Speaking In Delhi.
PM Modi : “अण्णा हजारेंना पुढे करत बेईमान लोकांनी दिल्लीला आपत्तीत ढकलले”, विधानसभेच्या तोंडावर पंतप्रधानांकडून ‘आप’वर टीका

अखिलेश यादव हे मुख्यमंत्री असताना हा प्रकार घडला होता. त्यावेळी अखिलेश यादव यांच्याकडे खाण मंत्रीपदाची जबाबदारीही होती. त्यावेळी बंदी असतानाही खाणकामाचे कंत्राट देण्यात आले होते. तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने खाणकामावर बंदी घातली असतानाही अवैधरित्या परवान्यांचे नूतनीकरण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. २०१६ पासून खाण गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा >>> One Nation One Election: २०२९ मध्ये देशभरात एकाचवेळी निवडणुका

तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यालयाने एकाच दिवसात १३ प्रकल्पांना मंजुरी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी सीबीआयच्या या समन्सकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे. राजकीय हेतूने हे समन्स बजावण्यात आल्याचे समाजवादी पक्षाने म्हटले आहे. अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता.

Story img Loader