नवी दिल्ली : काँग्रेसला प्रचंड आर्थिक चणचण भासत असून प्राप्तिकर विभागाच्या दंडात्मक कारवाईला स्थगिती दिली नाही तर, आगामी निवडणूक लढवणेही अशक्य आहे, असा युक्तिवाद काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी प्राप्तिकर अपीलीय लवादासमोर केला. या प्रकरणी लवादाने निकाला राखून ठेवला.

हेही वाचा >>> चीनमधून भारतीयांच्या माहितीवर डल्ला?

fadanvis
शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात तक्रारी, भाजपच्या बैठकीत लोकसभा निकालावर मंथन; जागावाटप लवकर करण्याची मागणी
Anger about allies in BJP meeting  Complaints of Shiv Sena  NCP not working in Lok Sabha Mumbai
भाजपच्या बैठकीत मित्रपक्षांविषयी नाराजी; शिवसेना, राष्ट्रवादीने लोकसभेत काम न केल्याच्या तक्रारी
Kumari Selja interview Haryana Congress Haryana state Assembly elections
पक्षांतर्गत दुफळी, प्रचाराच्या दोन वाटा! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणा काँग्रेसमध्ये नेमके काय सुरु आहे?
loksatta analysis bjp poor performance in assembly by election
विश्लेषण : बदलत्या राजकीय वातावरणात भाजपला जागांचा दुष्काळ? पोटनिवडणुकीत प्रभावक्षेत्रातच धक्का!
nana patole on congress mla cross voting
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचा दावा; नाना पटोले म्हणाले, “ज्या आमदारांनी…”
all Parties Strategize Independently contest elections, Joint Battle, allied parties, Kolhapur Assembly Elections, Maharashtra assembly election 2024, Parties Strategize Independently contest elections in Kolhapur,
कोल्हापूरमध्ये सर्वच पक्षांची स्वबळाची तयारी
sharad pawar group to accept donations from public
शरद पवार गटाला देणग्या स्वीकारण्याची मुभा; केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिलासा
Krupal Tumane, Krupal Tumane latest news,
लोकसभेची उमेदवारी नाकारलेल्या तुमाने, भावना गवळींचे पुनर्वसन

निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी पक्षाच्या वतीने किमान निधी पुरवावा लागतो. पण, काँग्रेसची बँक खाती गोठवली गेली तर, पक्षाच्या उमेदवारांचा किमान खर्च देखील करता येणार नाही. असे झाले तर काँग्रेस किती उमेदवारांना निवडणुकीसाठी उभे करू शकेल याबाबत शंका आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या कारवाईला स्थगिती देण्याची गरज आहे, असा मुद्दा काँग्रेसचे नेते व वकील विवेक तन्खा यांनी केला. मात्र, प्राप्तिकर विभागाच्या वतीने काँग्रेसचा युक्तिवादाला विरोध केला गेला. काँग्रेसला आर्थिक चणचण नसून दंडवसुली एवढा निधी पक्षाकडे आहे. पक्षाने कर भरला नसल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करावी लागत आहे. त्यामुळे दंडापोटी ६५ कोटी रुपये वसूल करण्यात आले अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या वतीने लवादाला देण्यात आली.