लोकसभा निवडणुकीनंतर देशात अस्थिर सरकार यावे, यासाठी कॉंग्रेससह तिसऱया आघाडीतील सर्वच पक्ष प्रयत्नशील आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या या नव्या चालबाजीला ओळखा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये मोदी यांनी जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये नेहमीप्रमाणे मोदी यांनी कॉंग्रेसच्या कारभारावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर देशात दुर्बळ सरकार यावे, अशीच कॉंग्रेस आणि तिसऱया आघाडीतील पक्षांची इच्छा आहे. जे स्वतः काही चांगले करू शकले नाहीत, ते दुसऱयाचे वाटोळे करायला निघाले आहेत. त्यांच्या या नव्या चालबाजीला जनतेने ओळखले पाहिजे. दिल्लीच्या गादीवर पुन्हा शासक बसवायचा की माझ्यासारख्या सेवकाला संधी द्यायची, याचा निर्णय मतदारांनी घ्यायचाय.
जनतेने कॉंग्रेसला ६० वर्षे दिली आता मला ६० महिने द्या, नामदारांना ६० वर्षे दिली आता कामदारांना ६० महिने द्या, असेही आवाहन मोदी यांनी यावेळी केले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2014 रोजी प्रकाशित
देशात अस्थिर सरकार येण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील – मोदी
लोकसभा निवडणुकीनंतर देशात अस्थिर सरकार यावे, यासाठी कॉंग्रेससह तिसऱया आघाडीतील सर्वच पक्ष प्रयत्नशील आहेत.

First published on: 01-04-2014 at 01:50 IST
TOPICSनरेंद्र मोदीNarendra Modiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress is trying for unstable government says narendra modi