पंजाब जालंधरचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचं निधन झालं आहे. संतोख सिंह ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाले होते. तेव्हा अचानक त्यांची प्रकृती खालावली. यानंतर संतोख सिंह यांना तत्काळ फगवाडा येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

खासदार चौधरी संतोख सिंह हे राहुल गांधी यांच्याबरोबर ‘भारत जोडो यात्रे’त चालत होते. त्यावेळी चालत असताना संतोख सिंह यांची तब्येत खालावली. संतोख सिंह यांना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांचं निधन झालं असल्याचं सांगितलं आहे.

Tanaji Sawant News
तानाजी सावंतांचा अजित पवारांसमोरच मोठा इशारा; म्हणाले, “…तर आम्ही सहन करणार नाही”
Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
kolhapur lok sabha marathi news, kolhapur sanjay mandlik latest news in marath
काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश

ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं असल्याचं समोर आलं आहे. ही माहिती मिळताच ‘भारत जोडो यात्रा’ स्थगित करण्यात आली. तसेच, राहुल गांधी रुग्णालयात दाखल झाले.

‘भारत जोडो यात्रा’ आज ( १४ जानेवारी ) सकाळी लोडोवाल येथून सुरु झाली. यात्रा १० वाजता जालंदर मधील गोराया येथे थांबत विश्रांती करणार होती. त्यानंतर दुपारी ३ वाजता पुन्हा यात्रा सुरु होत, सायंकाळी सहा वाजता फगवाडा बस स्टॉप जवळ थांबणार होती. ‘भारत जोडो यात्रे’चा रात्री मुक्काम कपूरथाला येथील कोनिका रिसोर्ट जवळ होता.