पीटीआय, रामनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात वापरलेल्या शब्दांनी वाहवत जाऊ नका, तर आगामी लोकसभा निवडणुकीत बदलासाठी मतदान करा असे आवाहन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी शनिवारी केले. उत्तराखंडमधील रामनगर येथे प्रचारसभेत बोलताना प्रियंका म्हणाल्या की, निवडणूक ही खऱ्या मुद्द्यांवर लढवली पाहिजे, पोकळ भाषणांच्या आधारे नाही.

Archana Patil Chakurkar
अर्चना पाटील चाकूरकरांच्या विरोधात लातूर शहर भाजपातील कार्यकर्त्यांची एकजूट
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Remove Director General of Police Rashmi Shukla Congress demand to Election Commission print politics news
पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
Dharavi mosque illegal portion demolished
धारावी मशिद तोडक कारवाई: मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप, सपा आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली

प्रियंका म्हणाल्या की, ‘‘मोदी त्यांच्या निवडणूक प्रचारात काय बोलतात त्याने भुलू नका. तुमचे मत टाकण्यापू्वीर्वी तुम्ही स्वत:ला प्रामाणिकपणे विचारा की मोदी सरकारच्या १० वर्षांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये कोणता सकारात्मक बदल झाला आहे’’? सतत वाढणारी बेरोजगारी, अनियंत्रित चलनवाढ आणि पेपरफुटीचे घोटाळे हे लोकांच्या आयुष्याचे सत्य आहे आणि त्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार जबाबदार आहे अशी टीका प्रियंका यांनी केली.

हेही वाचा >>>VIDEO | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर रोड शोदरम्यान दगडफेक, डोक्याला दुखापत; YSR आमदाराच्या डोळ्याला इजा

अंकिता भंडारी आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील महिलेच्या खुन्यांना संरक्षण देण्यासाठी कोण जबाबदार आहे असा प्रश्न लोकांनी मोदींना विचारावा असे आवाहन प्रियंका गांधी-वढेरा यांनी केले. मोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या आणि प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्यासारखी जनतेला दिलेली कोणतीही आश्वास पाळली नाहीत असा आरोप त्यांनी केला. प्रत्येक निवडणुकीत भाजप मतांसाठी धर्माचा वापर करतो अशी टीका प्रियंका यांनी केली. आमच्यासाठी धर्म हा राजकीय प्रयोगासाठी नाही असे त्या म्हणाल्या.