सध्या भारत-कॅनडामध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडामधील संघटित गुन्हेगारी, फुटीरतावादी शक्ती, हिंसाचार आणि अतिरेकी यावर भाष्य केलं. तसेच राजकीय कारणांमुळे या सर्व गोष्टींवर त्यांनी चिंताही व्यक्त केली. ते न्यू यॉर्कमध्ये ‘परराष्ट्र संबंधावरील परिषदेत’ बोलत होते.

जयशंकर म्हणाले, “मागील काही वर्षात कॅनडात अनेक संघटित गुन्हे घडले. फुटीरतावादी शक्तींकडून संघटित गुन्हे आणि हिंसाचार झाला. हे सर्व एकमेकांमध्ये फार मिसळून गेलेलं आहे. त्यामुळेच आम्ही तपशील आणि माहितीवर बोलत आहोत.”

Jayant Patil Ajit Pawar Sharad Pawar
राष्ट्रवादीत फूट पडण्याला कोण कारणीभूत ठरलं? जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…
Nagpur , ved Prakash arya
पंतप्रधानांकडून शरद पवारांवरील टीका राष्ट्रवादीच्या पथ्यावर – आर्य
Russia defence minister Andrei Belousov
रशिया- युक्रेन युद्धः लष्करी पार्श्वभूमी नसलेल्या नेत्याला पुतिन यांनी केले संरक्षणमंत्री, कारण काय?
BJP confused by Prime Minister Narendra Modi appeal regarding Shiv Sena NCP
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाने सारेच संभ्रमात; नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीने ‘रालोआ’त यावे!
praful patel
भाजप नव्हे, काँग्रेसमुळेच राष्ट्रवादी नेत्यांची बदनामी
hindu muslim polarization will hit bjp hard says congress leader muzaffar hussain
हिंदु-मुस्लिम ध्रुवीकरणाचा भाजपला मोठा फटका बसेल; काँग्रेस नेते मुजफ्फर हुसेन यांची टीका
Nepal currency note
नोट प्रिंटिंग प्रकरणावरून भारताने नेपाळला सुनावलं; परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर म्हणाले, “हा निर्णय…”
Sharad Pawar criticism that Narendra Modi has no moral right to demand the power of the country again
नरेंद्र मोदींना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

“भारताने मोठ्या संख्येने प्रत्यार्पणाची विनंती केली”

“भारत सरकारने कॅनडाला मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची आणि तेथून बाहेर देशात गुन्हे करणाऱ्या नेत्यांची माहिती दिली आहे. भारताने मोठ्या संख्येने प्रत्यार्पणाची विनंती केली आहे,” असंही जयशंकर यांनी नमूद केलं.

हेही वाचा : ‘फाइव्ह आइज’ कराराअंतर्गत अमेरिकेकडूनच कॅनडाला निज्जर हत्येचे धागेदोरे? काय आहे हा करार?

“कॅनडात दहशतवाद्यांचे नेते”

यावेळी जयशंकर यांनी कॅनडात दहशतवाद्यांचे नेते असल्याचं स्पष्ट झालं आहे, असाही आरोप केला. त्यांनी कॅनडात भारतीय राजदूत आणि दुतावासावर होत असलेल्या हल्ल्यावरही चिंता व्यक्त केली. तसेच लोकशाही अशाचप्रकारे चालते असं म्हणून याचं समर्थनही केलं जात आहे, असा आरोप केला.