फ्रान्समध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या झाल्यानंतर तीन दिवस दंगली सुरू होत्या यावर फान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या दंगलीसाठी व्हिडीओ गेम जबाबदार असल्याचे सांगितले आहे. देशात सुरू असलेल्या हिंसेवर चर्चा करण्यासाठी आयोजित एका सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. मॅक्रॉन म्हणाले, ” ज्या मुलांना व्हिडीओ गेमचे व्यसन आहे ते प्रत्यक्ष आयुष्यातही रस्त्यावर व्हिडीओ गेममध्ये दाखवल्याप्रमाणे दंगली घडवून आणतात.”

फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष यांनी पालकांना आवाहन केले आहे की त्यांनी मुलांना घरीच सुरक्षित ठेवावे. सध्या देशात शांती प्रस्थापित करणे , ही खूप मोठी जबाबदारी आहे, त्यासाठी मुलांना हिंसेपासून दूर ठेवावे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : वाहतुकीचा नियम मोडल्यामुळे १७ वर्षांचा मुलगा पोलिसांकडून ठार, फ्रान्समध्ये नागरिकांकडून सलग तिसऱ्या दिवशी जाळपोळ, दगडफेक सुरूच

मॅक्रॉन यांनी टिकटॉक आणि स्नॅपचॅट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गंभीर आरोप लावला आहे. ते म्हणाले की या दंगली याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन सुरू झाल्या. त्यांनी या कंपन्यांना दंगली संदर्भातील संवेदनशील कंटेट हटविण्याची मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी टिकटॉक आणि स्नॅपचॅट सारख्या कंपनीला सोशल मीडियावर दंगली पसरवणाऱ्या व्यक्तींची ओळख समोर आणण्याची विनंती केली आहे जे लोक या सोशल मीडियाचा चुकीचा वापर करत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार या दंगली थांबवण्यासाठी ४० हजार सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून एका रात्रभरात ८७५ लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे अटक करण्यात आलेली मुलांपैकी अनेक मुले ही फक्त १४ ते १५ वर्षांची आहे.

हेही वाचा : वाहतुकीचा नियम मोडल्यामुळे १७ वर्षांचा मुलगा पोलिसांकडून ठार, फ्रान्समध्ये नागरिकांकडून सलग तिसऱ्या दिवशी जाळपोळ, दगडफेक सुरूच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फ्रान्समध्ये दंगली का होत आहे?

या दंगलीला मंगळवारपासून (२७ जून) सुरुवात झाली आहे. फ्रान्सच्या नॅनटेरेमध्ये एका १७ वर्षीय मुलाने वाहतूक नियम मोडल्यामुळे एका पोलिसाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला होता. त्याबाबत पोलिसानी सांगितले होते की, या मुलाने गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता. मात्र जेव्हा या घटनेचा व्हिडिओ समोर आला तेव्हा पोलिस खोटं बोलत असल्याचे समोर आले. यामुळे संतप्त झालेले लोक थेट रस्त्यावर उतरले.