सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुन (एनआरसी) विरोधात देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये निदर्शनं केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री यांनी ज्यांना राजकारण करायचे त्यांनी खुशाल करावे मात्र शैक्षणिक संस्थांना राजकीय आखाडा बनवू नये, असे म्हटले आहे.
राजकीय घडामोडींमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकास स्वातंत्र्य आहे, मात्र महाविद्यालय व विद्यापीठांना याचे केंद्र बनवू देऊ नये. विद्यार्थी या ठिकाणी शिकण्यासाठी येतात, ते देशाची आशा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार हे कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असे पोखरीयाल यांनी म्हटले आहे.
Union Human Resource Development (HRD) Minister, Ramesh Pokhriyal in Kolkata: If someone wants do politics, they can, but do not make educational institutes its hub. Students come to get education, they are the country’s hope. Modi ji’s government will not tolerate this. (29.12) pic.twitter.com/NhYzHeueTN
— ANI (@ANI) December 29, 2019
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया इस्लामिया विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, यादवपुर विद्यापीठासह देशभरातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मोठ्याप्रमाणवर निदर्शनं करत आहेत. तर, या कायद्याबद्दल विरोधकांकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा देखील केंद्रीयमंत्री पोखरीयाल यांनी आरोप केला आहे.