भारतात एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. भारतातील विविध भागात एप्रिल आणि मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. यंदा उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका मध्य भारताला बसण्याची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातही उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा ‘आयएमडी’कडून देण्यात आला आहे.

कोणत्या भागात सर्वाधिक उष्णता वाढणार?

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या दरम्यान गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हिमालचल प्रदेश, महाराष्ट्र, बंगाल या राज्यासह आदी भागांमध्ये सर्वाधिक उष्णता असणार आहे. याबरोबरच समुद्रकिनारी असलेल्या भागालादेखील उष्णतेचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ujani dam, rain, Pune district,
सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पुढील महिनाभराच्या पावसावर उजनीचे भवितव्य
navi mumbai morbe dam marathi news
मोरबे धरण ५१ टक्के भरले ! धरणात मागील काही दिवसांपासून दमदार पाऊस, आतापर्यंत १६२६ मिमी पावसाची नोंद
more sections impose on mihir shah under motor vehicle act
वरळी अपघातातील मोटर वाहन कायद्याअंतर्गत कलमांमध्ये वाढ
Vidarbha is likely to get heavy rainfall and yellow alert has been issued for rain till July 10
विदर्भात पावसाचा ‘येलो अलर्ट’, पण कधीपर्यंत…?
average price of a vegetarian thali increased by 10 percent in the month of june
जूनमध्ये शाकाहारी थाळी महाग; मांसाहारी थाळी मात्र स्वस्त!
Bridge collapsed in Bihar
बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला; १५ दिवसांतील दहावी घटना
There has not been much increase in the dam stock in Satara
जून महिना संपला तरी साताऱ्यातील धरणसाठे रीतेच
weekly horoscope 1 july to 7 july
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी! वृषभ-कर्क राशीच्या लोकांना मिळेल अपार पैसा अन् यश

हेही वाचा : Video: मोदी सरकार उद्योगपतींचं? आरोपांबाबत विचारणा करताच मोदींनी दिला नेहरूंच्या कार्यकाळाचा संदर्भ; म्हणाले…

मे महिन्यात चार अंशानी तापमान वाढणार?

मार्च महिन्यात ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्यात एक किंवा दोन अंश सेल्सिअस तापमान कमी जास्त झाल्याची नोंद झाली. मात्र, एप्रिलमध्ये या तापमानामध्ये दोन किंवा तीन अंशाने वाढ होणार आहे. तसेच हे तापमान वाढून एप्रिल महिन्यात ४२ अंश आणि मे महिन्यात तापमानामध्ये आणखी वाढ होऊन ४४ अंशापर्यंत जाऊ शकते, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

उष्णतेची लाट दहा दिवस राहणार?

एक ते तीन दिवसांच्या तुलनेत या वर्षी उष्णतेची लाट आठ दिवस राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, भारतात एप्रिल-मे महिन्यात सूर्य आणखी तापणार असल्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे.