करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशातील बेरोजगारी वाढल्यानंतर आता अनलॉकदरम्यान परिस्थिती पुन्हा पुर्ववत होतानाचे चित्र दिसत आहे. देशातील बेरोजगारांच्या संख्येत कमाची घट झाल्याचे चित्र सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकनॉमीने (सीएमआयई) जारी केलेल्या आकडेवारीमधून दिसत आहे. बेरोजगारी कमी झाल्याचे दिलासादायक चित्र दिसत असलं तरी देशातील १० राज्यांमधील बेरोजगारीचे प्रमाण चिंताजनक असल्याचेही या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. पर्यटन व्यवसायावर आधारित राज्यामध्ये बेरोजगारी वाढल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे या आकडेवारीमध्ये महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रमाण हे उत्तर प्रदेशपेक्षाही अधिक असल्याचे दिसत आहे. सीएमआयईच्या अहवालासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरयाणामध्ये १९.१७ टक्के लोकं बेरोजगार अशून त्या खालोखाल राजस्थानमध्ये बेरोजगारीचे प्रमाण १५.३० टक्के तर दिल्लीत १२.५ टक्के इतके आहे. निवडणूक असणाऱ्या बिहारमध्ये बेरोजगारांची संख्या ११.९ टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे डोंगराळ प्रदेशांमधील राज्यांमध्येही बेरोजगारांचे प्रमाण अधिक असल्याचे या आकडेवारीतून दिसत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये १२ टक्के तर उत्तराखंडमध्ये सर्वाधिक म्हणजेच २२.३ टक्के लोकं बेरोजगार आहेत. त्याचबरोबर त्रिपुरामध्ये १७.४ टक्के, गोव्यात १५.४ टक्के आणि जम्मू काश्मीरमध्ये १६.२ टक्के लोकं बेरोजगार आहेत असं सीएमआयईच्या सप्टेंबरच्या अहावालामधून समोर आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra is ahead of uttar pradesh in unemployment rate says cmie data of september scsg
First published on: 20-10-2020 at 11:45 IST